About

Monday 18 January 2016

फॉर्चून मॉडीफायर

आपली कार एकोणचाळीसाव्या मजल्यावरील पार्किंग कडे वळवताना मधुकररावांनी हलकेच मागे वळून पाहिले की कोणी मागून भरधाव येत तर नाही ना? हल्लीची पिढी ज्या सुसाट वेगाने या उडणाऱ्या हवाई कार्स पळवत असे ते मधुकररावांना अजिबात पसंत नव्हते. एकावर एक असे ४० पदरी रस्ते देखील यांना पुरत नव्हते. गाड्या पळवायला. क्लबमध्ये गप्पा मारताना या मुद्द्यावर टीका करणे ही त्यांची आवडती सवय होती. गेटवरील मशीनमध्ये त्यांनी कार्ड इन्सर्ट केले आणि गेट उघडले. कोपऱ्यातल्या पार्किंगवर त्यांनी आपली कार पार्क केली.

      एकोणचाळीसाव्या मजल्यावर त्यांचे ऑफिस होते. बाहेर निऑन साइन्सचा बोर्ड झगमगत होता.
“पुष्पक हवाई टॅक्सी प्रायवेट लिमिटेड.”
त्यांनी बेल दाबल्यावर त्यांच्या रोबो अटेंडनस ने त्यांचे स्वागत केले. प्रसन्न चेहर्याची ही गार्गी त्यांना खूप आवडत असे. तिची वर्चुअल सुंदरता हे तर कारण होतेच. पण तिची कामातली निपुणता. त्याहून त्यांना आवडत असे ते ती स्त्री असूनही कसलेही नखरे करत नसे किंवा त्यांच्या पत्नीप्रमाणे कीटकीट करत नसे. त्यांच्या टेबलसमोरच्या भिंतीवर  परमपूज्य गुरुमहाराज कल्पक्ल्पेशानंद यांच्या एन्लार्ज करून लावलेल्या प्रचंड मोठ्या डिजिटल तसबिरीला त्यांनी वंदन केले. मधुकरराव गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाहेर ओढत शीर्षगामी रुद्राक्ष दोन्ही डोळ्यांना लावत हलकेच “ गुरु माऊली कृपेची साऊली"  अस भक्तीभावाने पुटपुटले. मग गार्गीने आणलेली भगीरथ मिनरल वाटरची बाटली फोडत त्यांनी दोन घोट घेतले. तोवर गार्गी ने कॉफी मशीन मधून वाफाळती कॉफी आणली. चवीने घोट घेत घेत मधुकरराव टेबलवरील काम चाळू लागले. आणि लवकरच त्यांच्या तोंडाची चव गेली. हल्ली त्यांची कंपनी घाट्यात चालली होती.  भारतात योगी जांबुवंत यांचे सरकार आल्यापासून या उडत्या कार्स च्या किंमती खूप स्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येकाकडे कार असेच. त्यामुळे टॅक्सीने प्रवास करणारे वरचेवर कमी होत चालले होते. शिवाय या क्षेत्रात स्पर्धाही खूप वाढली होती. दीर्घ निश्वास टाकून त्यांनी कामामध्ये डोके खुपसले.

सायंकाळी ४ च्या सुमाराला गार्गीने पुन्हा एकदा कॉफी आणून दिली. कॉफी घेत मधुकरराव विचार करू लागले. आज क्लबात न जाता कुटुंबाला घेऊन बाहेर जेवायला जावे काय कुठे तरी. त्यांनी बायकोला फोन करण्याचा विचार केला. हल्ली त्यांची पत्नी मालतीबाई आणि त्यांची जवळ जवळ भेटच होणे दुरापास्त झाले होते. त्या कधी घरी असतात आणि कधी बाहेर जातात किंवा घरी येतात तरी की नाही याबद्दलच शंका होती. त्या पार्ट्या, डिस्को, मित्रमैत्रिणी यातच मश्गुल असत. त्यांची सिरीयस अफेयर्सही सुरु असावीत अशी त्यांची शंका होती. बभ्रुवाहन.. त्यांचा बावीस वर्षांचा तरुण मुलगा आणि वासवदत्ता त्यांची वीस वर्षांची मुलगी. हे असतील काय घरी? बभ्रुवाहन सतत नशेत असे. हवाई गाड्यांच्या रेसेस मध्ये भाग घेणे हा त्याचा छंद होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. आणि मुलगी वासवदत्ता ही देखील लेट नाईट पार्ट्यामध्येच व्यस्त असे. यापैकी कोणीही घरी नसणार. आज ही नाही आणि पुढेही असा योग येईल याची खात्री नाही. हताशपणे मधुकररावांनी स्वत:शीच मान हलवली. काय आपल्या कुटुंबाची ही वाताहत झाली आहे. पुन्हा त्यांनी गुरु माउलींच्या फोटोकडे पाहून हात जोडले. “बघा माउली ही तुमच्या लेकराची अवस्था.”

 मागच्या भेटीत त्यांनी गुरु माउलीला आपली करूण कहाणी ऐकवली होती. कल्पक्ल्पेशानंद महाराजांनी त्यांना सांगितले होते की मधुकरराव तुमच्या मागे दुर्धर साडेसातीची दशा सुरु आहे. शनी महाराजांना शांत करावे लागेल. अस सांगून त्यांनी एक विजिटिंग कार्डही दिले होते. मधुकर रावांनी ड्रावर उघडत ते विजिटिंग कार्ड हातात घेतले. जोतीर्भास्कर नारायणशास्त्री उपाध्ये. फाॅर्च्युन माॅडिफायर अॅंड फेट केअर टेकर. बस्स ! आज भेटूयाच यांना. मधुकररावांनी ठाम निश्चय केला. गार्गीला हाक मारून त्यांनी लवकर निघत असल्याची सूचना दिली. तिला टेबल आवरण्यास सांगून त्यांनी गुरु माऊलीला वंदन करून ऑफिसमधून प्रस्थान ठेवले.

****************************

९ व्या रस्त्यावरील त्या झगमगत्या पॉश इमारतीतील बहात्तराव्या मजल्यावरील आलिशान ऑफिसमध्ये जोतीर्भास्कर नारायणशास्त्री उपाध्ये यांच्या पुढे मधुकरराव बसले होते. जोतीर्भास्कर त्यांच्या लॅपटॉप मध्ये मधुकररावांची पत्रिका स्टडी करत होते. थ्रीपीस सूट, गोरापान चेहरा, तरतरीत नाक, आणि सोनेरी काड्यांच्या चष्म्याच्या आडून दिसणारे घारे डोळे. प्रथमदर्शनीच छाप पडावी असे उपाध्येबुवांचे व्यक्तिमत्व होते. लॅपटॉपमधून डोके वर काढत उपाध्ये बुवांनी चष्मा हातात घेतला. त्याच्या काचा पुसत घारे डोळे बारीक करत मधुकररावांकडे एक कटाक्ष टाकला.

“ हे पहा मधुकरराव तुमच्या साडेसातीचा कडक काळ सुरु आहे. आम्ही नुसते भविष्य प्रेडीक्ट करत नाही तर ते मॉडीफाय देखील करतो हे तुम्हाला ठावूकच असेल. आमच्या दोन मेथड आहेत. एक परंपरागत स्लो मेथड आहे. आणि एक आहे अत्याधुनिक इंस्टट मेथड. पैकी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जाता येईल.”
मधुकरराव नम्र चेहरा करत म्हणाले,

“माफ करा पण मला याबद्दल अधिक सांगाल काय. मी आज प्रथमच येतोय तुमच्याकडे.”

“आमची परंपरागत पद्धती म्हणजे पूर्वी जसे विधी करत असत ते आम्ही आधुनिक पद्धतीने आणि इंस्टंटली करतो. उदाहरणार्थ तुम्हाला नागनारायण बली विधी करायचा आहे. तर आमच्या स्विमिंग टॅंक ला आम्ही अत्याधुनिक ग्राफिक्स विजुअलाएजेशन तंत्राने कुशावर्त कुंडाचे हुबेहूब रूप दिले आहे. त्यात कुशावर्त डोहातील पाणी मिनरलायजेशन करून भरलेले आहे. सगळे मंत्र वगैरे रेकोर्डेड आहेत. ते आम्ही १०x स्पीड ने चालवतो. आणि साधारण हा तीन दिवसांचा विधी आम्ही एका तासात नाशिकला न जाता विधिवत पद्धतीने इथेच उरकून देतो.”

मधुकररावांना हे मनापासून आवडले,

“अच्छा, हे फारच छान ! आणी दुसरी पद्धती कोणती?”

“आम्ही ज्याला फाॅर्चून मॉडीफिकेशन आणि केअर टेकिंग म्हणतो ती ही आमची इंस्टंट रीजल्ट पद्धती. आम्ही काय करतो यामध्ये की समजा एखाद्या मुलीला मंगळ आहे. तर तिला इथेच व्रते साधना वगैरे सांगत बसण्यापेक्षा आम्ही तिला थेट मंगळावरच पाठवतो. तिथल्या इंडियन वसाहतीत आमची खास राखीव जागा आहे. आलिशान सुईट आणि ऑफिस आहे. तिथे साधारण १५ दिवस राहून सर्व इंस्टंट व्रते पार पाडल्यानंतर त्या मुलीचा मंगळ ग्रहाचा प्रभाव पूर्ण नाहीसा होतो. पृथ्वीवर राहिल्याने मंगळाचा होणारा गुरुत्वीय इफेक्ट आणि विकीरणाचा परिणाम देखील नाहीसा होतो. अश्या मुलींना आम्ही मंगळ रिटर्नड सर्टिफिकेट देतो. आमची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. या सर्टिफिकेट च्या योगे त्या मुलीच्या पत्रिकेतला मंगळ निष्प्रभ ठरून ग्राह्य धरला जात नाही. आणि तिच्या विवाहातील अडचण दूर होते."

मधुकरराव ऐकून थक्क झाले होते. आणि शनीमहाराजांसाठीचा उपाय ऐकण्यास उत्सुक.

“ मग साडेसातीसाठी काय करता आपण?”

उपाध्ये बुवांनी मधुकररावांच्या चेहऱ्यावरील उत्साह ताडून विस्तृतपणे सांगायला सुरवात केली.

  “ साडेसातीवर उपाय ही तर आमची स्पेशालिटी आहे मधुकरराव. मंगळाप्रमाणेच आमची शनीवरील इंडियन वसाहतीत देखील खास जागा आहे. माननीय पंतप्रधान योगीराज जांबुवंत यांच्याकडे वजन खर्ची घालून मी ती मिळवली आहे. आणि एक गुपित सांगू का तुम्हाला मा.पंतप्रधान हे आमचे खास व्ही आय पी क्लायंट आहेत. तुम्हाला शनी ग्रहावरील सुप्रसिद्ध शनीमंदिर तर माहितच असेल. तर जांबुवंतांनी खास प्रयत्न करून आम्हाला त्या शनी मंदिराच्या शेजारची जागा मिळवून दिली आहे. तर आम्ही साडेसातीच्या क्लायंटला साडेसात दिवस थेट शनीग्रहावरच पाठवितो. तिथले आमचे प्रतिनिधी कम मॅनेजर वेदोनारायण आचार्य घाणेकर साडेसात दिवस सर्व शास्त्रोक्त पूजाविधी पार पाडतात. थेट शनीग्रहावर जाऊनच ही पूजा केल्याने साडेसात दिवसात संपूर्ण साडेसाती नाहीशी होते. शनीदेव प्रसन्न होऊन बरकत देतात. अगदी १०० % खात्री बर का.”

हा इंस्टंट माॅडीफिकेशन उपाय ऐकता ऐकताच मधुकररावांनी तो करायचे मनोमन निश्चित केले होते. जाताना जोतीर्भास्कर उपाध्येंच्या कॅशीयर कडे या शनीग्रहवारीची भरगच्च रक्कम भरूनच ते घरी परतले.

*********************
यथावकाश मधुकरराव शनीग्रहावरची शनी वारी आटोपून आले. पाहता पाहता सहा महिने उलटले. त्यांच्या पत्नीच्या मालतीबाईंच्या अफेयर्सनी आता चांगलाच जोर पकडला होता. बब्रुवाहनची व्यसने वाढली होती. वासवदत्तेच्या लेट नाईट पार्ट्यांचे प्रमाणही आता हाताबाहेर गेले होते. पुष्पक टॅक्सी कंपनीची हालत जैसे थे होती. उलट तोटा दिवसेंदिवस वाढत होता. शनीग्रहवारीचा विपरीत परिणाम झाल्यासारखे वाटत होते. मधुकरराव वैतागून गेले होते. एके दिवशी वैतागून त्यांनी जोतीर्भास्कर उपाध्येंचे ऑफिस गाठले.

उपाध्येंच्या टेबलसमोरच्या खुर्चीत बसून मधुकररावांनी आपले सगळे गाऱ्हाणे त्यांना ऐकवले. उपाध्येंनी आपला सोनेरी काड्यांचा चष्मा हातात घेत घाऱ्या डोळ्यांनी मधुकररावांकडे बेरकीपणे पाहिले. मग चष्मा पुसून डोळ्यांवर चढवत त्यांनी लॅपटाॅप समोर ओढला.

“हे पहा मधुकरराव तुमची कुंडली मी परत एकदा नवीन कॅल्क्युलेशन्स मांडून टॅली केली. तुमच्या केस मध्ये एक कॉम्प्लिकेशन निर्माण झाले आहे. अस हजारात एखाद्याच केस मध्ये होते. तुमची दैवगतीच विचित्र दिसते.”
अस म्हणून बुवांनी एक लांबलचक पॉज घेत परत लॅपटाॅप मध्ये डोके खुपसले. ए सी च्या थंडगार हवेत आलेला कपाळावरचा घाम पुसत मधुकररावांनी करूण नजरेने काहीसे हबकून जात उपाध्ये बुवांकडे डोळे लावले. थोड्या वेळाने उपाध्येंनी त्यांच्याकडे पाहत सांगितले.

“मधुकरराव तुमच्या शनीग्रह फेरीच्या वेळी तुमची ग्रहदशा विपरीत होती. त्यामुळे तुमच्या कुंडलीत एक नवीन दोष निर्माण झाला आहे. हा आमचे पुज्य पिताजी जोतीर्भास्कर विश्वंभरशास्त्री उपाध्ये यांचा जोतीषशास्त्रातील नवीन शोध आहे. तुमच्या शनीग्रहावरील वास्तव्याच्या दरम्यान पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा आणि विकीरणाचा ग्रहदशेवर विपरीत परिणाम होऊन तुमच्या कुंडलीत पृथ्वीची साडेसाती निर्माण झाली आहे.”

मधुकरराव थक्क होऊन उपाध्येबुवांकडे पाहत राहिले. शनी, गुरु, मंगळ, शुक्र नव्हे संपूर्ण आकाशगंगेची साडेसत्तरी मागे लागल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता.

© सुहास भुसे.


जिजाऊची लेक प्रीटी झिंटा

साधारण 2001-03 च्या आसपास बॉलीवुडशी सबंधित एक खटला खुप गाजला होता.

बॉलीवुड आणि अंडरवर्ल्ड चे लागेबांधे सर्वांनाच ठाऊक होते पण यावर भाष्य करण्याची कोणाची हिंमत नव्हती. कारवाई तर दूरची बात.

अशात बॉलीवुड मधला एक मोठा फायनांसर भरत शाह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची कुंडली बाहेर येत गेली. जाळ फैलावत गेल. चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाचा निर्माता नसीम रिजवी हा छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सिद्ध झाले. त्याने या सिनेमासाठी छोटा शकीलचा काळा पैसा वापरल्याचे सिद्ध झाले.

या खटल्यात बॉलीवुड मधील नामचीन अश्या  13 व्यक्तींनी साक्षी दिल्या होत्या.
त्यात सलमान ख़ान, शाहरुख़ ख़ान, राकेश रोशन, महेश मांजरेकर, अली मोरानी , संजय गुप्ता आदींचा समावेश होता.

यातील सर्व च्या सर्व जणांनी आपली साक्ष कोर्टात फिरवली आणि ते होस्टाइल झाले. हेच हीरो पडद्यावर शुर वीर नायक रंगवतात. 50 -50 जणांची एकट्याने धुलाई करतात. व्हिलन चे प्रचंड साम्राज्य एकहाती लढा देऊन संपवतात.

पण अंडरवर्ल्डच्या धमक्यांनी त्यांचे सगळे शौर्य बाहेर निघाले.

आणि त्यावेळी अख्ख्या बॉलीवुड मधून एकच रणरागिणी आपल्या साक्षीवर अटळ अडिग ठाम राहिली .

ती म्हणजे प्रीटी झिंटा.

तिने शेवटपर्यन्त सर्व दबाब झुगारुन देत, सगळ्या डॉन लोकांच्या धमक्या फाट्यावर मारत आपली साक्ष बदलली नाही.

तेव्हा मी कॉलेजला होतो. प्रीटीचा आधीच चाहता होतो. या गोष्टीमुळे तर प्रिटिने मनात घर केले.
कालांतराने प्रिटिच्या कुटुंबाचा इतिहास समजला. आणि तिच्या या शौर्याचे आणि मोडेन पण वाकणार नाही बाण्याचे रहस्य देखील समजले.
..
सन 1761 रोजी  झालेल्या पानीपतच्या महासंग्रामानंतर अनेक मराठा कुटुंबे पानीपतच्या परिसरातच स्थायिक झाली.  पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात. अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे.

तर प्रिती झिंटा ही मराठा वीरांगणा..
मुळ आडनाव झांटे रत्नागिरी जिल्ह्यातील..
..
 शौर्य हा मराठ्यांचा जेनेटिक गुणधर्म आहे हे सिद्ध करणारा प्रीटी झिंटा हा मोठा पुरावा.
पानीपतच्या शौर्यदिनाची आठवण होताना यापुढे या जिजाऊच्या तेजस्वी लेकीची प्रीटीचीही आठवण अवश्य ठेवावी.
©सुहास भुसे.


साक्षात्कार

Men In Black या सिनेमात एक सीन The Galaxy नावाचा खुप प्रसिद्ध आहे. अवघ्या 1 मिनिटांचा हा संवादविहीन सीन कमालीचा सूचक आहे.

सिनेमाचा नायक आणि नायिका विल स्मिथ आणि लिंडा एका कारमध्ये आहेत. कॅमेरा वरुन विहंगम दृश्य टिपतोय.
मग कॅमेरा प्रचंड वेगाने वर जाऊ लागतो आणि दिसणारा दृश्यपट विस्तारत जातो. आधी तो परिसर, मग ते शहर, मग अमेरिका, सगळे खंड मग पृथ्वी सौरमाला ...
दृश्यपट विस्तारत राहतो आणि दिसणारी प्रत्येक अवाढव्य गोष्ट  लहान ..नगण्य होत जाते.

मग संपूर्ण आकाशगंगा, मग अनेक आकाशगंगा आणि मग दृश्य विश्वाच्याही पलीकडे जाते आणि दिसते हा सर्व विस्तार एका गोटीमध्ये आहे. एका रिंगणात अश्या दोन गोट्या आहेत. एक प्रचंड हात येतो..चार बोटे असणारा, अमानवी आणि विश्वरूपी गोटी उचलून नेम धरतो व ती दूसरी विश्वरूप गोटी उडवून जिंकतो. आणि आनंदाने दोन्ही गोट्या उचलून आपल्या बटव्यात टाकतो. त्यात त्या हाताच्या धन्याने आधीच जिंकलेल्या अनेक गोट्या असतात.

एक मिनिटाचा हा सीन पहिल्यांदा पाहताना आश्यर्याची परमावधी होते. बसल्या जागेवर उडतोच माणूस. आणि नंतर किमान तासभर तरी विचारात पडतो. असही असू शकेल या शक्यतेसोबतच अश्या अनेक शक्यतांचा विस्तृत पट आपल्याला दिसू लागतो. लहान, मोठे, विराट अश्या परिमाणांची सापेक्षता ध्यानात येते. या पटावरील स्वत:चे अतिनगण्य अस्तित्व जाणवते. आणि जाणवते हा जङजव्याळ विश्व विस्तार मानवी बुद्धी च्या आवाक्याबाहेरचा आहे. अंतिम सत्य करोड़ो योजने दूर आहे. जे कदाचित आपणास कधीही गवसणार नाही.

आणि आपल्या ध्यानात येत की आस्तिक नास्तिक वाद , जातीवाद , धर्मसंघर्ष, राष्ट्रवाद अश्या गोष्टी तुलनेने किती तुच्छ व क्षुल्लक आहेत. परिणाम आणि व्याप्तीच्या दृष्टीने सगळी तात्विक आतात्विक भांडणे आणि एकूणच आपले जीवनचक्र नगण्य व निर्रथक वाटू लागते आणि आपले मन एका अनुनुभुत, अद्वितीय साक्षात्काराने भरून जाते.
©सुहास भुसे


झॉंबी हेअरस्टाईल

पृथ्वीराजची हेअर कटिंग करून घेताना मी जातीने जवळ थांबून लक्ष देतो. समोर वस्तरा लावू नको, कानावर नको, इथे अस कर, तिथे तस कर वगैरे सूचना सुरु असतात. कधी मशरूम कट, सफर , समर कट वगैरे. थोडक्यात पृथ्वीच्या भावी हेअर स्टाईल ची काळजी.

आणि मला आठवत आमची लहानपणीची हेअर स्टाईल. आमच्या लहानपणी आम्ही सलून मध्ये वगैरे जात नसू तर न्हावी आमच्या अंगणात येत असे. मग तिथे पथारी पसरून कटिंग चा कार्यक्रम सुरु होई. साधारण ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी एकच हेअरकट ठरलेला होता. त्यात चॉइसची वगैरे संधी नसे. टोटल इनटॉलरन्स .. त्याचे प्रमुख दोन उद्देश असत. केस ओले राहून सर्दी होऊ नये व परत कटिंगची वेळ लवकर येऊ नये.

तर तो जो कट होता त्याची आठवण देखील भयंकर आहे. न्हावी त्याची मशीन काढायचा. आणि बागेतील हरळी कापावी तस सगळ डोक एकसलग साफ करून टाकायचा. सगळीकडे खुरटी बुडे राहायची फक्त. हे ही सहन करण्यास हरकत नव्हती. पण याच्या पुढचा प्रकार खरा भयंकर. डोक्याच्या वरच्या भागावर जशी शेंडी ठेवतात. तसे न्हावी कपाळावर बरोबर वरच्या बाजूला काही केस समांतर रेषेत राखत असे. बाकी सगळे डोके साफ आणि समोर फक्त केसांचा पूंजका. किती भयंकर दृश्य दिसत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि सुदैवाने त्या दिव्य हेअरस्टाईलीतले आमचे फोटो वगैरे उपलब्ध नसल्याने ती हेअरस्टाईल नामशेष होण्यात आमचाही हातभार.

आणि एक असे... हा सगळ्या गावातील सगळ्याच पोरांचा कॉमन हेअर कट असल्याने कोणी कोणाला हसण्याचा प्रश्न नसे.

हा दिव्य हेअरकट आमच्या न्हाव्याची स्वत: ची व्हर्जनल कलाकृती असावी. दुर्दैवाने तो औंढी सारख्या ब्याकवर्ड गावात जन्मला. तो जर युरोपमध्ये असता तर जुन्या काळातही त्याचा हा युनिक हेअरकट ब्लॉंड, वेज, मोहाक, ग्रूव्ह वगैरे नावाखाली भयंकर लोकप्रिय झाला असता.  गेला बाजार झॉंबी हेअरस्टाईल म्हणून तरी लोकांनी डोक्यावर घेतला असता याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.
©सुहास भुसे.




Monday 11 January 2016

आ ह साळुंखे सरांच्या अमृतवर्षावात

आ ह साळुंखे सरांच्या सानिध्यात एक अविस्मरणीय दिवस घालवला ती आठवण शेयर करायची लांबली थोडी.
निमित्त होते इतिहास चिंतन शिबिराचे .

स्थळ होते.
जिजाऊ ज्ञान मंदिर प्रशाला, कोंडी.
सोलापूर जिल्ह्यातील आम्ही एक निवडक 50 60 लोक होतो.

सकाळच्या सत्रात मनमोकळया गप्पा झाल्या. आ ह सरांनी प्रत्येकाची विचारपूस करत सर्वांना बोलते केले. अनेकांनी आपले मौलिक अनुभव सांगितले.

जेवणानंतरच्या दुपारच्या सत्रात आ ह सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले. एक विद्वान प्रचंड अभ्यासक व्यक्ती आपल्या चिरपरिचित ऋजु शैलीत बोलत असल्याने सगळेच कानात प्राण आणून ऐकत होते. आ ह सरांचे प्रदीर्घ भाषण सर्वांच्या मनावर कोरले गेले. सगळे इथे ऊध्रुक्त करणे शक्य नाही. पण काही निवडक वेचक मुद्दे ..स्फुट स्वरुपात ..आ हं च्या शब्दात.

" ** मराठा म्हणजे मोड़ेन पण वाकणार नाही. असा गर्व. कुणी शिकवले हे ? हे कुठून आले ?
छत्रपतींनी मोडेन पण वाकनार नाही निती वापरली नाही.
अस म्हणणे म्हणजे एक खच्चीकरण नितीच होय

** सामाजिक चळवळ 2 पद्धतीने पुढे न्यावी

1. ज्यांनी इतिहास चुकीचा लिहिला त्यांचे माप पदरात घालणे योग्यच...
पण 365 दिवस तेच करने योग्य नाही.
FTI , NSOD मध्ये किती मराठा किंवा बहुजन मुले आहेत? चित्रपट नाटके कला यात प्रवेश कसा करावा त्यात करियर कसे करावे याचे मार्ग याचे प्रबोधन हवे. ते जास्त गरजेचे आहे.

2 तपासल्याशिवाय काही घ्यायच नाही अस बुद्धांनी सांगितले आहे.
प्रबोधनाचा प्रवास डोक्यापासून ह्रदयाकडे नव्हे तर ह्रदयाकडून डोक्याकडे झाला पाहिजे

** बुद्धांनी ज्यासाठी हयात झिजवली  त्याच साठी आज ही भांडतोय आपण
समता स्वातंत्र्य. म्हणजे परिस्थिति जैसे थे आहे.

**व्यूह रचना करा.
जनसामान्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करा.
समाजात 10 ℅शोषक 90 ℅ शोषित आहेत.
त्यातले 89 ℅ देवांवर श्रद्धा ठेवणारे आहेत.
जर तुम्ही कपाळावर मी ईश्वर मानत नाही अस लिहून प्रबोधन करायला गेलात तर त्यांच्या घराचेच नव्हे तर मनाचेे ही दरवाजे आपल्याला बंद होतात.

**चळवळी का फसतात ?
थेट हल्ला नको.
एखादा वर्षात 6 सत्यनारायण घालतो. तुमच्या प्रबोधनाने त्याने प्रमाण कमी केले व तो आता 2 सत्यनारायण घालतो. तर ते चळवळीचे यश माना. बदल एका रात्रीत होत नाहीत.

**बाहेरून लादलेल् गोंदण हे बाहेरच असल तरी खरवडुन काढताना यातना होतातच.
आपण व्यूह रचनेत कमी पडतो.

** मुकाट नसावे तसेच मोकाट ही नसावे.
** प्रश्न विचारनारांवर हल्ले करु नयेत. त्यांचे समाधान होईपर्यन्त शांतपणे उत्तरे द्यावित्.
** जिभेच्या खेळाने संस्कृती उभी राहत नाही.

सरांच्या विचारांच्या धबधब्यात सगळे श्रोते चिंब होत होते. मनातल्या अनेक शंकांची पुटे दूर होत होती. सर बोलत राहावेत आपण ऐकत राहावे असेच वाटत होते. पण वेळ मर्यादा होती.

शेवटी सरांनी सर्वांचा निरोप घेतला. बाहेरच्या पुस्तकांच्या स्टॉल वर सर्वांनी आ ह सरांची पुस्तके घेतली. मी ही जी माझ्याकडे नव्हती ती पुस्तके घेऊन कोटा पूर्ण केला. बळीवंश च्या प्रतिवर खुद्द आ ह सरांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत आणखीच पावन केली.
..
आणि एका अविस्मरणीय दिवसाच्या आठवणी मनात घोळवत आम्ही सर्व आपापल्या मुक्कामी परतलो.




Wednesday 6 January 2016

पांढरमिशी पठाण

“भावोजी, ताईला घेऊन जाईन उद्या सकाळी. पाच दिवसांनी कार्यक्रम आहे. तुम्ही पण नक्की या आदल्या दिवशी. "

भावोजी रानातून आल्यावर निवांत जेवणे सुरु होती. मग गणेश ने भीत भीत भावोजींना विचारले. भावोजी म्हणजे एकदम सणकी खोपडी. त्यांना पूर्वीपासून गणेश जरा वचकूनच असे.

“आं ? पाच दिवस अगोदर काय काम आहे? गणेश राव आमी काय हाताने भाकरी थापाव्या मनता काय इतके दिस?”

“आईने आग्रहाने सांगितले आहे. ताईला घेऊनच ये म्हणून..आईला हल्ली उठबस होत नाही जास्त. ताईची मदत होईल तिला ”

“गणेश राव हे काही जमायचं नाही,”

भावोजींनी जेवण आणि विषय संपवत हात धुतला.

“कारेक्रमा दिवशी सकाळी या. घिवून जावा आणि सांच्याला आणून सोडा.”

गणेश खट्टू झाला. प्रचंड राग आला. पण करतो काय? जेवण झाल्यावर आतल्या खोलीत ताईला जाऊन म्हणाला.

“ताई मी काही मुक्काम नाही करत. तुझा सनकी नवरा आणि तू घे बघून कधी यायचे ते. मी जातो आताच.”

“अरे गणेश मी बघते बोलून त्यांच्याशी. आता कुठे जातो इतक्या रात्री परत? ९ वाजलेत. त्यात अमावस्या आहे आज ”

“नको ताई, काळजी करू नको, जाईन मी दीड दोन तासाचा तर रस्ता आहे.”

अस म्हणून ताईचा निरोप घेऊन गणेश घुश्श्यातच बाहेर पडला होता. गावाच्या बाहेर आल्यावर हायवेवर  बरेच ढाबे त्याच्या संतापाला खुणावत होते. त्याच्या गावाकडे रस्ता वळतो तिथल्या वळणावरच्या ढाब्यात गणेश घुसलाच. भावोजींना इरसाल शिव्या हासडत पी पी पिला. शेवटी जास्त झाली आणि तिथेच लूढकला.

थंडी वाजू लागल्यावर गणेश ने डोळे हलकेच उघडत आजू बाजूला पाहिले. आपण ढाब्यावरील एका बाजेवर अस्ताव्यस्त झोपलेले बघून तो जरा दचकलाच. उठून घड्याळात बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले. कपडे झटकत तो उठला. तो त्याचा थोडासा तोल गेला. म्हाताऱ्या साधूची गुंगी अजून होतीच डोक्यात. पण तरी त्याला विश्वास वाटला की जाईल तो घरी व्यवस्थित. पाय खोडत मोटारसायकलकडे जात गाडी सुरु केली आणि निघाला.

किरर्र अंधार..आजू बाजूला चिल्लारी, रामकाठी बाभळीची झाडे आणि ऊसाचे फड. सगळा रस्ता निर्मनुष्य. औषधालाही एखादी गाडी किंवा माणूस पास होत नव्हते. गणेश ला आता थोडी थंडी जाणवू लागली. हे ठीकच..त्याने विचार केला. थंडी वाजतेय म्हणजे म्हाताऱ्या साधुचा असर आता कमी होतोय. थोडे पुढे गेल्यावर गाडीच्या उजेडात एक म्हातारा आणि एक कुत्रे रस्त्याने जात असलेले त्याला दिसले. च्या आयला रात्रीच्या दोन ला हा थेरडा कुठे चालला म्हणायचा ? वळून त्याच्या कडे बघत गणेश ने त्याला पास केले. म्हातारा उंच निंच आणि ताठ दिसत होता. डोक्यावरचे केस आणि पांढऱ्याधोप मिश्या त्याच्या गाडीच्या उजेडात चमकल्या. म्हातारा सरळ समोर बघत होता. अंगात मांजरपाटाचे बनियन आणि धोतर. आणि सोबतचा तो त्याच्या मिश्या सारखाच पांढराधोप कुत्रा. असो तिच्या मारी म्हणत गणेश ने गाडी दामटली.

थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला अजून एक म्हातारा आणि कुत्रा पुढे चालताना गाडीच्या उजेडात दिसला. च्या आयला! म्हातारा साधू पिल्यामुळे मला काय म्हाताऱ्यांची लॉटरी लागली काय म्हणत स्वतशीच हसत गणेश पुढे जाऊ लागला. त्याच्या जवळून जाताना गणेश ने वळून पाहिले आणि तो चरकला. तसेच शुभ्र केस.. पांढऱ्याधोप मिश्या आणि तसाच पेहेराव. कुत्रे देखील सेम. च्या मारी हा म्हाताऱ्या साधूचा झटका म्हणत त्याने मान झटकली आणि पुन्हा गाडी दामटली.

थोडे अंतर पुढे गेल्यावर पुन्हा एकदा उजेडात त्याला एक म्हातारा आणि कुत्रा चालताना दिसला. मग मात्र गणेश घाबरला. तोंडाने हनुमान स्त्रोत्र म्हणत हा म्हातारा तो नसावा अशी प्रार्थना करत सावकाश पुढे जाऊ लागला.   जवळून जाताना त्याने भीत भीत मान वळवली तर तोच म्हातारा. तेच केस, त्याच मिश्या तेच बनियन, धोतर आणि कुत्रा. गणेशचे अंग लटपटू लागले. इतक्यात हलकेच मान वळवत त्या म्हाताऱ्याने गणेशकडे बघितले. त्यांचे लाल गुंजे सारखे डोळे बघून गणेशची पाचावर धारण बसली. ओल्ड मॉन्कची नशा झटक्यात उतरली. थरथर कापत त्याने स्पीड वाढवला. फुल स्पीड मध्ये गाडी सुसाट सोडली.

थोडे पुढे जाताच तो म्हातारा आणि त्याचा कुत्रा परत. गणेश ने देवाचा धावा करत तिकडे न बघत समोर चाकाच्या खाली नजर लावली आणि मुठ ओढली. आता तो म्हातारा आणि त्याचा कुत्रा त्याच्या गाडीसोबत धावू लागले. गणेशने स्पीडमीटर बघितला. ९० चा स्पीड होता. गणेश च्या अंगाला दरदरून घाम फुटला. तसल्या थंडीत त्याचा शर्ट घामाने ओलाकच्च झाला. समोर लक्ष केंद्रित करत तो गाडी दामटू लागला. तो म्हातारा आणि कुत्रा त्याच्या गाडीसोबतच धावत होते. जणू त्यांची रेस लागली होती. गणेशने जितकी मुठ ओढता येईल तितकी ओढून धरली होती. थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला एक अतिथंड हवेचा झोत जाणवला. आणि खडखड आवाज करत त्याची गाडी बंद पडली. बजरंग बली चा धावा करत त्याने इकडे तिकडे न बघता  किक मारण्याचा झपाटा सुरु केला. काही केल्या गाडी सुरु होईना. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून बाजूला पाहिले. तिथे कोणीही नव्हते. त्याला त्यातल्या त्यात थोडे हायसे वाटले. कार्बोरेटर आणि पेट्रोल चेक करावे म्हणून तो उतरला. उतरताना त्याची नजर सहज मागे गेली.

१० फुट अंतरावर मागे तो म्हातारा आणि कुत्रा जणू हवेत धावत होते. त्यांचे हात पाय हलत होते पण त्याना जणू कोणी अदृश्य शक्तीने धरून ठेवले होते. म्हाताऱ्याच्या मिश्या एखाद्या बोक्यासारख्या फिस्कारल्या होत्या. चेहऱ्यावर भयंकर संताप दिसत होता. त्याचे गुंजेसारखे लालभडक डोळे त्या अंधारात विस्त्यासारखे चमकत होते. तो रागारागाने हवेत हात मारत होता. जणू गणेशचा गळा पकडण्यासाठी.  तसेच डोळे त्याच्या कुत्र्याचेही दिसत होते. कुत्रा जणू फक्त हाडाचा सापळा असावा. गणेश ने सर्व शक्ती एकवटून एक भयंकर किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध होत रस्त्यावर आडवा झाला.

त्याने डोळे कण्हत उघडले तेव्हा एक फेटेवाला म्हातारा त्याच्या चेहऱ्यावर वाकून  बघत होता. गणेश ने गप्पकन डोळे मिटून घेत किंकाळी फोडली. व न थांबता तो किंचाळू लागला. म्हाताऱ्याने सटपटत त्याचा तोंडावर हात दाबला.

“पोरा आर शांत हो. डोळे उघड. भिऊ नगस. तू आता माज्या घरी हाय ”

त्याचा आवाज ऐकून  गणेश ने भीत भीत डोळे उघडले. म्हाताऱ्यावरची नजर काढत आजू बाजूला नजर फिरवली. एक तरूण मुलगी दोन तरुण मुले एक पोक्त माणूस एक म्हातारी त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांचे मानवी चेहरे पाहून त्याला धीर आला आणि तो उठून बसला.
त्याच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत म्हाताऱ्याने विचारले

“तापीनी फनफनलय प्वॉर.. काय झाल लेकरा? काय दिसला तुला? कशाला भेलास इकत ?”

गणेश थोडेसे भानावर येत त्यांना रात्रीची कथा सांगितली.  म्हातारा तोंडावर हात नेत म्हणाला,

“आर त्यो पांढर मिशी पठाण. लय जालीम हाय त्यो. पण त्यो त्याच्या गावाची शिव वलंडत न्हाय. तू जीत पडलास तीतच शीव त्याची. तुज नशीब बलवत्तर पोरा. जीवानिशी वाचलास. काल आमोशा व्हती .आमोशेला लय फार्मात असतो तो गडी.”

म्हाताऱ्याने दोन्ही गालावर चापट्या मारत राम राम म्हटले.

गणेश घरी आला तेव्हा तापाने फनफनला होता. कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत त्याचा ताप उतरला नाही. गणेशची बातमी कळताच ताईला भावोजीने झक मारत माहेरी आणून सोडले हे एक अजून.

©सुहास भुसे


Sunday 3 January 2016

सरस्वती की सावित्री ?

विद्येचे प्रतिक, वाग्देवता म्हणजे सरस्वती मानली जाते. प्रतीके, संकेत, चिन्हे, देवता, धर्म, परंपरा, आणि संस्कृती व समाज यांचे धागे परस्परांत गुंतलेले असतात. सगळ्या गोष्टींचा परस्परावर दृश्य, अदृश्य परिणाम होत असतो.

उदा. एखादी मुलगी आहे जी लहानपणापासून आपल्या घरात एक तसबीर पाहते. त्यात देवी लक्ष्मी शेषशायी विष्णूचे पाय चूरत आहेत आणि विष्णू ऊर्ध्व लावून पहुडले आहेत. अश्या मुलीला नवऱ्याच्या पायाची दासी बनवण्यासाठी इतर फारश्या संस्कारांची गरज पडणार नाही. भारतीय समाजात स्त्रीचे दुय्यम स्थान असण्यात अश्या प्रतीकांचा खूप मोठा वाटा आहे. साहित्यातल्या उपमा पहा. जोडी मधले जे जास्त उदात्त जास्त व्यापक जास्त उत्तुंग असेल ते पुरुषाचे प्रतिक असते तर उलट स्त्रीचे. उदा. पुरुष झाड तर स्त्री लता. पुरुष समुद्र तर स्त्री नदी. पुरुष आकाश तर स्त्री धरा. अश्या प्रतीकांचा, संकेतांचा संस्कारक्षम वयात subconscious mind  वर नकळत खोल परिमाण होत असतो.

विद्येची देवता सरस्वतीची पुराणातली कहाणी देखील अशीच आहे. मुळात ती विद्येची देवता किंवा वाग्देवी का असावी याचे कोणतेही समर्पक कारण सरस्वतीच्या चरित्रात नाही. ज्यायोगे कोणा विद्यार्जन करणाराला प्रेरणा मिळावी. तिचा जन्म ब्रह्मदेवाच्या दाढेपासून झाला. म्हणजे अतिदुय्यम प्रतीकात्मक जन्मकथा. परत ब्रम्हदेव, प्रत्यक्ष पिताच तिच्यावर आसक्त झाला. अबला नारी. स्वत:चे सरंक्षण न करू शकणारी. तिला परत तिचा प्रेमी , स्वामी पुरुरव्याने शाप दिला. म्हणजे पिडीत पुरुषांच्या जुलुमाने पिचलेली शोषिता, सोशिका.

अस प्रतिक कसली प्रेरणा देणार? काय म्हणून विद्येची देवता मानावे सरस्वतीला ? समाजाच्या संक्रमणावस्थेत अश्या प्रतीकांचा त्याग करून नव्या प्रेरणादायी प्रतीकांचा समाजाने स्वीकार केला पाहिजे.  विद्येची अधिष्टात्री देवता म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीकापेक्षा कोणते प्रतिक योग्य असू शकेल ?

 स्त्रियांना आणि शोषिताना आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सेवामुर्ती सावित्रीबाई. टवाळखोर सनातन्यांची कुचेष्टा, त्यांचे दगड, शेण अंगावर झेलून आपले कार्य न डगमगता सुरु ठेवणाऱ्या संघर्षमूर्ती सावित्रीबाई. बालहत्या प्रतिबंधक गृह, स्त्रीपुरुष समानता, जातीअंताची लढाई यासाठी हयात खर्च करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई. स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणाऱ्या पहिल्या स्त्रीशिक्षिका, विविध सामाजिक विषयांवर आपले स्वतंत्र तेजस्वी विचार लिहिणाऱ्या, धार्मिक चिकित्सा करणाऱ्या विदुषी सावित्रीबाई.

या दोन्ही प्रतीकांची तुलना केल्यास कोणते प्रतिक वाग्देवी, विद्येचे प्रतिक म्हणून योग्य वाटते ? सरस्वती की सावित्रीबाई ?

सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात सरस्वती पूजना ऐवजी सावित्री वंदनेने व्हायला हवी. पाटीपूजन करताना सरस्वतीच्या नव्हे सावित्रीच्या चित्राला अभिवादन करायला हवे. सर्वत्र जिथे जिथे सरस्वती देवीचे रूपक वापरले जाते तिथे तिथे हे नवे तेजस्वी प्रेरणादायी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिक समाजाने स्वीकारायला हवे. यासाठी सर्व सुज्ञ, पुरोगामी, समाजसुधारक, विद्वान, साहित्यिक, अभ्यासक, कलाकार, विद्याप्रेमी लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.

आज या विद्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही लेखरूपी लहानशी आदरांजली. _/\_

© सुहास भुसे


गोष्ट एका गोष्टीची : भाग 2

कितीतरी वेळ दोघे निशब्द एकमेकांचा निकट स्पर्श अनुभवत बसून होते.  आजूबाजूला अंधार दाटून आला होता. रागिणीने काहीसे भानावर येत विचारले,

“विक्रांत खरे तर अजिबात इच्छा होत नाहीये. पण मला निघायला हवे.”

“हं ..जायलाच हवे का?”

“विक्रांत प्लीज, मला आधीच कठीण होतेय निरोप घेणे.”

ती हळवी झाली होती.

“ठीक आहे. चल निघूया.” विक्रांत जड स्वरात म्हणाला.

एकमेकांच्या हातात हात घालून बिलगून चालत त्यांनी हॉटेलपर्यंतचे अंतर कापले.

“रागिणी आता परत कधी भेट होईल आपली.”

“यावेळीच खूप सायास करून आलेय रे मी भेटीला. पुढे लवकर भेटणे कठीण आहे. पण नक्की भेटू आपण.”

“मला खूप आठवण होईल तुझी.”
“अरे मी टच मध्येच असेन की.”
“हो म्हटले तर एका टचच्या अंतरावर म्हटल तर दोन ध्रुवावर दोघे आपण.”

दोघे खिन्न झाले. परत निशब्दत: दाटून आली.

“रागिणी मी सोडू का तुला गाडीने”
“अरे नको, मी जाईन.”
अचानक विक्रांतच्या लक्षात आले. त्याने रागिणीला एक सुंदर गिफ्ट आणले होते. ते द्यायचेच विसरून गेला तो.
“रागिणी तू ५ मिनिट थांब, मी लगेच आलो.”
“का रे, काय झाले ? कुठे जातोस ?”
“अग मी एक गिफ्ट आणले आहे तुझ्यासाठी. रूम मध्ये आहे घेऊन येतो. पाचच मिनिट थांब.”
“ओके ..पण अरे थांब न मी पण येईन. फ्रेश होते जरा.”

विक्रांत ने बेडवर बसत आपली बॅग उघडून त्यातला छानसा नेकलेस बाहेर काढला. रागिणीला किती शोभून दिसेल हा. रागिणीला कोशॉप ब्रँड ची ज्वेलरी आवडते हे विक्रांत ला ठाऊक होतं. तिला याबद्दल त्याने सांगितले नव्हते तिला सरप्राईज करण्याचा त्याचा विचार होता. हलकेच दरवाज्याचा आवाज झाल्यावर त्याने मान वर केली. बाथरूमच्या दरवाज्यातून ओल्या ताज्या चेहऱ्याने रागीनी बाहेर येत होती. गर्द जांभळ्या पालाझो मधील तिचा ठसठ्शीत बांधा उठून दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर रूळनाऱ्या त्या कुरळ्या केसांच्या महिरपी, तिचा विपुल केशसांभार. इतका वेळ बाहेर ज्या गोष्टी त्याने लक्षपूर्वक पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टींवर या एकांतात त्याचे डोळे खिळून राहिले.

 आरश्यासमोर उभे राहत रागिणीने चेहऱ्यावर एक हलकासा मेकअप चा हात फिरवला. आणि आरश्यातून आपल्याला पाठमोरे न्याहाळनारी त्याची नजर आणि त्यातली तीव्र ओढ तिला जाणवली. आरश्यातूनच त्याच्याकडे पाहत तिने विचारले,

“अरे अस काय पाहतोस? आणि हातात काय आहे ते नेकलेस ? वॉव किती सुंदर. तुला कधी म्हणाले होते मी सहज मला पण आठवत नाही. आणि तू मात्र पक्के लक्षात ठेवलेस हे."

विक्रांत ने स्मितहास्य करत म्हटले,
“घालून दाखव बघू, मी परत कधी बघेन तुला काय ठावूक?”
“अस काय म्हणतोस रे,”
 ती भावूक होऊन म्हणाली.
“अस बोलत आहेस जणू आपण आता भेटणारच नाही कधी. आण इकडे तो नेकलेस. घालते मी.”

तिच्या प्रतिबिंबाकडे बघत तो उठला व तिच्या मागे आला. क्षणभर दोघे आरश्यात एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. मग तिने मान तिरकी करत आपले मोकळे केस पुढे घेतले. त्याने समजून आपल्या हाताचे तिच्याभोवती कडे करत नेकलेस तिच्या गळ्यात घातला.  त्याचे हात थरथरत होते. दातांनी क्लिप पक्की करताना तिच्या सेंटचा मादक गंध त्याला वेडा करत होता. त्या निकटतेमुळे दोघांचेही श्वासोच्छवास एकमेकांना ऐकू येतील एवढा श्वासांचा आवेग वाढला होता. क्लिप लावून सरळ होत विक्रांत ने तिच्या खांद्यावर हात ठेवत रागिनीला हलकेच आपल्याकडे वळवले. तिचे गाल आरक्त झाले होते आणि नजर झुकली होती. विक्रांतने तिची  हनुवटी वर उचलण्याचा प्रयत्न केला.  लाजुन रागिणी त्याच्या मिठीत शिरली. विक्रांत क्षणभर हडबडला. मग त्यानेही हात पसरत तिला आपल्या बाहूपाशात आवळले.

क्रमश:

क्रमश: शब्द वाचताच वैदेहीचा चेहरा पडला. तिने मेल बॉक्स बंद करत लॅपटॉप झाकला. गोष्ट वाचता वाचता आपलाही श्वासांचा आवेग वाढला आहे हे तिच्या लक्षात आले. तिने आपला श्वास थोडा  नियंत्रित केला. मग आपला सेल उचलत “ क्रमश: ? व्हाट द हेल क्रमश:"  अस पुटपुटत तिने योगेशला फोन लावला.

“अरे योगेश, ही काय जागा आहे का रे क्रमश: करण्याची? गोष्टीच्या सर्वोच्च बिंदूवर आणून तू चक्क क्रमश: लिहितो आणि मला मेल करतो गोष्ट ?”

योगेश तिचा आवेश पाहून खो खो हसू लागला.

“अरे हसतोस काय वरून? आणि मला आधी सांग ही कथा तुला कशी सुचली? तूच विक्रांत तर नाही ना? ही सत्यकथा तर नव्हे ना?”

हे ऐकून योगेश अजूनच हसू लागला.

“अग वेडाबाई, सत्यकथा असती तर मी सांगितली नसती का तुला? अग पूर्ण काल्पनिक कथा आहे ही.”

“बर ठीके. असू दे. पण मला आता पटकन पुढची कथा पाठव तरी किंवा सांग तरी लगेच बर.”

“वैदेही अग मी लिहिली नाही अजून पुढची गोष्ट. आता काय व्हावे पुढे यावर विचार करतोय.”

“योगेश गुमान सांगतोस की देऊ एक गुद्दा? लिहिली नसशील तर काय लिहिणार आहे सांग. आता काय होते पुढे?”

“वैदेही मी असा विचार करतोय की विक्रांत आणि रागिणी त्या प्रेमाच्या अत्युच्च बिंदूकडे पाठ फिरवून मन आवरतात. आणि एकमेकांचा निरोप घेतात.”

“काय ? का मन आवरतात? ते पुढे जात नाहीत? हा काय गाढवपणा योगेश ? अस कस शक्य आहे? आणि पण मी म्हणते त्यांनी का जाऊ नये पुढे ? त्यात काय वाईट आहे?”

“अग वैदेही म्हणजे मी विचार करत होतो कि जर त्यांनी हे टाळले तर त्यांच्या गोष्टीला एक उदात्त टच मिळेल. एक फिलॉसॉफीकल डूब मिळेल. लोकांना प्रेमापेक्षा त्याग आवडतो.”

“योगेश मी सांगते ना तुला. या वळणावरून कोणीही परत फिरू शकत नाही. तू जर तस लिहिले तर तुझी गोष्ट दांभिक होईल. तू संस्कार कथा लिहिणार आहेस की वास्तवकथा? आणि हे बघ त्या जुनाट बुरसटलेल्या परंपरा संस्कार वगैरे कल्पना मला सांगू नको. माणसाची सगळी सुखे कशी नासवता येतील याचा एककलमी कार्यक्रम म्हणजे परंपरा. विक्रांत-रागिणी ने त्याग करूच नये. त्यांचे प्रेम आहे एकमेकांवर आफ्टरऑल.”

“ओके वैदेही. ठीक. मान्य. हे लिहितोच मग.”

“आणि ना आता एक व्हिलन आण गोष्टीत. त्याची बायको किंवा तिचा नवरा. संघर्ष, भांडणे, प्रेमाची कसोटी. मजा येईल.”

“छे छे वैदेही. या गोष्टीत तसले काही होत नाही. मी सुखांत लिहिणार आहे. विक्रांत आणि रागिणी आपापले प्रपंच सांभाळून, जबाबदाऱ्या पार पाडून जर जीवनातील सर्वात सुंदर गोष्टीचा, प्रेमाचा आनंद घेणार असतील तर काय हरकत आहे.? ते असच चॅट करत राहतात. प्रपंच सांभाळून एकमेकांना भेटत राहतात. संसाराच्या रुक्ष वाळवंटात हे ओअॅसीसरुपी प्रेम त्यांना जगण्याची उमेद देत राहील. अशी एखाद्या धावत्या भेटीची शिदोरी त्यांना कित्येक दिवस पुरेल. आणि तुझ म्हणणे पटले मला. त्यांनी सेक्स केला तरी काय हरकत आहे? परपुरुषाचा विचार न करणाऱ्या स्त्रिया किंवा परस्त्रीचा विचार न करणारे पुरुष कितीसे असतील. स्त्रिया जेव्हा सलमान,अक्षय,ऋत्विक वर मरत असतात किंवा पुरुष मल्लिका, करीनाचे सिनेमे पाहतात किंवा सनी च्या क्लिप पाहतात तेव्हा ते काय करत असतात. मग या फिक्शन ला त्यांनी थोडे मुर्त रूप दिले तर काय चुकले ? व्यभिचार हि संकल्पना मान्य करूनच पाहायचे असेल. तर हाही एक प्रकारचा मानसिक व्यभिचारच नाही का?”

योगेश जेव्हा अस बोलत असे तेव्हा वैदेही नेहमी भान हरपून त्याचे बोलणे ऐकत असे. त्याचे विचार तिला खूप आवडत. त्याला अजून बोलत करत ती म्हणाली,

“हो योगेश, हे एकदम परफेक्ट बोललास तू बघ. अगदी पटले. आणि सांग शेवट कसा करणार?”

“वैदेही मी रूढार्थाने या गोष्टीचा शेवट करणारच नाही.  ट्वीस्ट आणायचे काम मी वाचकांवर सोपवणार. म्हणजे अस बघ ही गोष्ट खूपच कॉमन आहे. युनिवर्सल. अनेकांच्या बाबतीत घडली असेल. आता घडत असेल. पुढे घडू शकेल. या सुखांतानंतरचा ट्वीस्ट मी वाचकांवरच सोडून देणार आहे. त्यांनी हवे ते रंग भरावे आणि ही गोष्ट आपली बनवावी.”

“च्या आयला योगेश. तू फार भारी आहेस रे. उगीच नाही मरत तुझ्यावर मी. आणि एक सांगू का? तुझी ही गोष्ट वाचून मलाही तुला भेटण्याची खूप ओढ लागली आहे रे. म्हणजे माझा तसा आग्रह नाही. पण मला खूप आवडेल तुला भेटायला. आपण पण किती दिवस कॉल आणि चॅट वरून बोलणार?”

योगेश फोनवर खो खो हसू लागला.

“थोडक्यात उरलेली गोष्ट घडवून आणून जगायची आहे तर तुला वैदेही !”

“हो..आणि अरे ऐक ना बेल वाजतेय. बहुतेक माझा नवरा आला वाटते. मी फोन ठेवते. चॅटवर ये बोलू आणि तुझे उत्तर सांग कधी भेटायचे ते. चल बाय लव्ह यु .”

अस म्हणत फोन ठेवत वैदेही दरवाजा उघडायला उठली.  

-समाप्त ....

©सुहास भुसे



गोष्ट एका गोष्टीची : भाग- १

हॉटेल  रत्नहार पॅलेसच्या आलिशान डायनिंग हॉल मध्ये  बसून तो आतुरतेने तिची वाट पाहत होता. एव्हाना यायला हवी होती ती. त्याने परत बैचेन होऊन घड्याळात पाहिले. दीड वाजत आले होते. एक वाजता त्यांचे भेटायचे ठरले होते. आपल्या या तीव्र ओढीचे त्याला आश्चर्य वाटले. या परिपक्व वयात देखील आपल्या भावना एखाद्या षोडशवर्षीय तरूणाइतक्याच तीव्र असल्याचे त्याला जाणवले. तिलाही तितकीच ओढ वाटत असेल याची त्याला खात्री होती. तरी तिने उशीर का करावा? तस म्हटल आज ते दोघे एकमेकांना पहिल्यांदाच भेटणार होते. तरीही ते दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखत होते.

 त्याला आठवले त्यांची मैत्री झाली त्याला एव्हाना एक वर्ष लोटले होते. त्यांची ओळख झाली ती फेसबुक वर. तो एक नवोदित कवी होता. त्याच्या भावगर्भ कविता वाचून ती प्रभावित झाली होती. त्यांची हळू हळू मैत्री झाली. मग इनबॉक्समध्ये गप्पा सुरु झाल्या. एकमेकांच्या आवडी निवडी आणि स्वभाव खूप जुळतात अस त्यांच्या लक्षात आले. ती विलक्षण बुद्धीमती होती. चतुर आणि हजरजबाबी. त्याला विशेष आवडला तो तिचा नर्मविनोदी स्वभाव. तिच्याशी बोलायला त्याला खूप आवडायचे. त्याला तिच्याशी बोलणे काहीसे आव्हानात्मक वाटायचे. ती कधी कोणता विसंगत मुद्दा हेरेल आणि त्याला पेचात पकडेल त्याची शाश्वती नसे. त्यामुळे त्याला जपून बोलायला लागायचे. त्यांच्या गप्पात तिचा पती आणि त्याची पत्नी सोडले तर कोणतेच विषय वर्ज्य नसायचे. दोघेही चांगलेच व्यासंगी असल्याने त्यांच्या गप्पांचा वारू विविध विषयात चौखूर उधळायचा. हळू हळू त्यांचे चॅटिंगचे प्रमाण वाढत चालले. शक्य तर दोघे कॉल करत. मिळालेला सगळा मोकळा वेळ ते एकमेकांशी गप्पा मारण्यात घालवत. तिला गाणी खूप आवडायची आणि त्याला पण. कधी कधी एकमेकांना सूचक गाणी पाठवून ते आपल्या भावना व्यक्त करायचे. त्याला ऑनलाईन यायला कधी उशीर झाला आणि ती नाराज असेल तर तो तिला यु रुठो न हसीना किंवा वो है जरा खफा खफा अशी गाणी पाठवे. तिचा आवाज खूप गोड होता. कधी कधी ती तिच्या आवाजात त्याच्यासाठी गाणी रेकॉर्ड करून पाठवे. तिने पाठवलेले तिच्या आवाजातले मै तैनु समझावा की न तेरे बिन लगदा जी तर त्याला इतके आवडले की दिवसातून किमान १० वेळा तो क्लिप ऐकत असे. एकदा त्याने तिला गाणे पाठवले. युही तुम मुझसे बात करती हो या कोई प्यार का इरादा है . हळू हळू दोघांच्या मनाची एकमेंकातली गुंतवणूक दोघांच्याही लक्षात येऊ लागली.

एकदा ती त्याला म्हणाली, “विक्रांत, ज्या माणसाना खाणे आणी गाणे आवडते ती माणसे जातिवंत रसिक असतात. प्रेम करावे तर त्यांनीच.”
एकदा तिने त्याला विचारले "विक्रांत तू ड्रिंक करतोस का ?"
त्यानेही ऑनेस्टली सांगितले "हो करतो न."
 तिने विचारले "कधी कधी करतोस कि नेहमी?"
 त्याने खरे खरे सांगितले. मग तिनेहि कबुली दिली कि तीही ड्रिंक करते. दोघांनी अगदी विविध ब्रांड आणि त्यांची टेस्ट व मजा यावर देखील गप्पा मारल्या. तिचा मोकळा ढाकळा आणि बोल्ड स्वभाव त्याला अजूनच आवडला. लवकरच त्यांचे नाते प्रेमात रुपांतरीत झाले. एकमेकांना दिवसातून शंभरवेळा तरी आई लव्ह यु स्टिकर्स ची देवाण घेवाण होऊ लागली. फ्लाइंग किसेस आणि हग मी च्या स्टिकर्सना उत आला.

एकदा त्याने विचारले,”रागिणी मी आग्रही नाही. पण तू मला प्रत्यक्ष भेटलीस तर मला खूप आनंद होईल.”
तिनेही संमती दर्शवली. आणि त्यांच्या गप्पांना एक नवीन विषय मिळाला. आपण अमुक ठिकाणी भेटू या. तमुक प्रकारे भेटू या. तू समोर आल्यावर मी पहिल्यांदा अस म्हणेन. मी अमुक करेन तमुक करेन. अश्या अनेक नाट्यमय काव्यात्म काहीश्या फिल्मी भेटी त्यांनी गप्पात प्लॅन केल्या.

ती म्हणायची”विक्रांत आपण खूप गप्पा मारू या”
“हो रागिणी, रात्रीच्या निरव शांततेत आपण तलावाच्या काठावर एखाद्या बाकावर गप्पा मारत बसूया”
“हो रे राजा. गोड गुलाबी हवा असेल. मी एक शोल घेतलेली असेल.”
“रागिणी पण माझ्याकडे शॉल नसेल.  मला थंडी वाजेल.”
“मग मी तुला माझ्या शॉल मध्ये आणि माझ्या मिठीमध्ये घट्ट लपेटून घेईन”
“मी तुझ्यावर तिथल्या तिथे एक छानशी कविता करेन”
“मी तुझ्यासाठी मै तैनु समझावा की गाईन.”

एकदा त्याने तिला विचारले, “रागिणी समजा आपल्या भेटीत आपल्याला मोह झाला आणि आपला तोल गेला तर.”
“तोल गेला तर म्हणजे नेमके काय विक्रांत..स्पष्ट शब्दात विचार ”
“म्हणजे समज आपल्याला फिजिकली ऍट्राक्शन वाटले आणि आपण शरीराने जवळ आलो तर? तश्या काही पॉसिबिलीटीज आहेत का?”
“विक्रांत माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्या मनाविरुद्ध काही करणार नाहीस.”
“म्हणजे तुझ्या मनातहि असे असेल तर हि पॉसिबिलीटी आहेच.”
“माझा तुझ्यावर विश्वास आहे विक्रांत.”
त्याला हसू आले.
“रागिणी हा विश्वास दोन प्रकारचा असू शकतो. एकतर मी तुला अपेक्षित नाही अस काही करणार नाही असा विश्वास किंवा एक तर मी जे करेन ते योग्यच असेल असा विश्वास.”
“विक्रांत लेट मी क्लियर धिस, हे बघ मला नीती अनीतीच्या फोल कल्पना मान्य नाहीत हे तर तुला माहितच आहे, त्यामुळे समज आपल्यात अस काही घडल तर त्याच मला वावड नाही. फक्त ते अस ठरवून करणे मला आवडत नाही. मला मनापासून तस प्रेरित करणारा पुरुष असेल तर ते होईल ही.”

तिला दांभिकपना कधीच आवडत नसे. तिचे स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर त्याला मनापासून आवडले.

तिच्या अश्या एक न अनंत आठवणीत तो रंगून गेला होता. खांद्यावरचा हलकासा स्पर्श, लेमोनेड सेंटचा मंद जवळून जाणवणारा मंद गंध आणि हलक्या आवाजात मारलेली विक्रांत अशी हाक याने तो भानावर आला. त्याने वळून वर पाहिले. मंद मंद हसत ती जवळ उभी होती. तो मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. ती फोटोतल्या पेक्षा किती देखणी दिसत होती. त्याची अवस्था पाहून हलकेच हसत ती समोरच्या खुर्चीवर बसली.

“काय रे कसला धक्का वगैरे बसला काय? अस काय पाहतोस.”
त्याने एक मंदस्मित केले.
“रागिणी तू प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसतेस.”
 ती या स्तुतीने काहीशी सुखावली.
“तूदेखील प्रत्यक्षात जास्तच रुबाबदार दिसतोस.”
"किती उशीर ग पण " तो कुरकुरला.
"विक्रांत खरे सांगू, मी केव्हाच बाहेर आले होते रे. बाहेरच्या पार्किंगजवळ लॉनवर थांबले बराच वेळ. "
"का ?"
"समोर दिसणारी पायरी चढावी की नको या विचारात.. "
" अच्छा ..तर मग शेवटी ओलांडून आलीस तर मग पायरी "
दोघांनीही एकमेकांकडे गहिऱ्या अर्थपूर्ण नजरेने पाहात स्मित केले.

मग त्याने भराभर तिच्या आवडीचे पदार्थ मागवले. तिच्या आवडीची मार्टीनी आणि त्याच्या आवडीची जस्मिन व्होडका मागवली.  दोघांनी हसत गप्पा मारत जेवण उरकले. दोघांनाही अस वाटतच नव्हत की ते पहिल्यांदा भेटत आहेत.  जुने जिवलग मित्र मैत्रिणी रोजच भेटतात तशी सहज भेट असल्यासारखीच वाटत होती. मग त्याने विचारले
“चल बीच वर जाऊ या का?  तिकडे बसू गप्पा मारत.”
तिने होकारार्थी मान हलवली.  पार्किंगकडे जाताना त्याला थांबवून  ती म्हणाली
“अरे गाडी राहू दे इथेच. जवळच तर आहे. चालत जाऊया. गप्पाही होतील. आणि पाय ही मोकळे होतील.”

बीचवर एका खडकावर पाण्यात पाय सोडून ते गप्पा मारत बसले.
“कस वाटल विक्रांत, प्रत्यक्ष भेटून मला.”
“रागिणी तस तर आपण रोजच भेटतो चॅटवर. पण शेवटी कल्पना आणि वास्तव यात फरक आहेच की. आज खूप छान वाटले.”
“ विक्रांत पण  आपण बोलायचो तशी नाट्यमयता या भेटीत नाही ह, फिल्मीपणा नाही. अगदी सरळ साधी भेट झाली आपली.”
“उत्स्फूर्त भावना आणि प्लॅन  यात फरक असणारच की रागिणी.”
 त्यांच्या गप्पाना अंत नव्हता.
संध्याकाळ दाटून  येत होती . मावळतीला रंगांची उधळण सुरु होती. दोघेही निशब्द झाले .
त्याने हलकेच तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. तिने विश्वासाने आपली मान त्याच्या खांद्यावर टेकली. स्तब्ध होऊन ते समोर सुरु असलेले रंगनाट्य पाहू लागले.

 क्रमशः

©सुहास भुसे


देव : एक दृष्टिकोन

देव आहे की नाही ? देवावर श्रद्धा असावी की नको ? अश्या प्रश्नावरुन घमासान सुरु असते. माझ्यामते आपल्या श्रद्धेला वैयक्तिक पातळीवर ठेवून तिचे सार्वजनिक प्रदर्शन टाळले तर अशी श्रद्धा बाळगण्यात कोणाचे नुकसान नाही.

बुद्धिप्रामाण्यवाद ही सैद्धांतिक पातळीवर कितीही गोंडस कल्पना वाटली तरी तिचा संपूर्णत: अंतर्बाह्य स्वीकार करणे खुप कठीण आहे. हां तसे ढोंग करणे मात्र सोपे आहे. नास्तिक विचारधारा हजारो वर्षात मोठ्या प्रमाणावर समाजात कधीही रुजली नाही.

लोकांना देव ही कल्पना आवडते. देव आणि त्याच्या अलौकिक चमत्काराच्या खऱ्या खोट्या कथा ऐकायला आवडतात. देव या कल्पनेचा त्यांना खुप मोठा मानसिक आधार वाटतो. मनातील एक खुप मोठी अंधारी पोकळी देव ही कल्पना भरून काढ़ते.

यावर एका लेखकाने एक खुप सुंदर उदाहरण दिलेले आठवते. एक गणिती विद्वान् होता . त्याने एक काल्पनिक संख्या शोधली  ' i '
त्याने खुप समीकरणे सुटली.

देव ही संकल्पना बस या ' i ' सारखीच आहे. न थोडी जास्त ..न थोडी कमी. काल्पनिक पण अनेक समीकरणे सोडवणारी...


बेफाम नवकवी

कविता पूर्वी मात्रा, वृत्ते, छंद यांच्या बंधनात बद्ध होती. प्रेम सूचक असे. शृंगार झाडावेली आडून हळूच लाजत बाहेर डोकावत असे. हळू हळू जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या, क्षितिजे विस्तारली आणि कवितेची घौडदौड मुक्तछंदात सुरु झाली. कवितेला एक नवा आयाम मिळाला. विद्रोही कवितांचे एक युग आले. घुसमटलेल्या जाणीवांना बाहेर येण्यास जागा मिळाली. त्यांनीही कवितेचे दालन समृद्धच केले..

“काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत.”

अश्या धाटणीच्या कवितांवर आमचा पिंड पोसला. हळूवार भावना, प्रेम आणि त्यागाच्या उदात्त कल्पना, रसपूर्ण सौंदर्यनिष्ठ शृंगार, तत्वनिष्ठेसाठी बंड, वीर रस...... ग ह खरे, ना धो महानोर, कुसुमाग्रज, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, दया पवार, यशवंत, विंदा, बहिणाबाई, बालकवी  अनेकांच्या अनेकानेक कविता वाचल्या. आस्वाद घेतला. मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या. नवरसांचे मिश्रण. सर्व रस ओतप्रेत भरलेले.
 
पण हल्ली ज्या कविता वाचायला मिळतात त्यांनी माझ्या मनातील कविता या संकल्पनेची काव्यमयताच उध्वस्त करून टाकली आहे. त्यातल्या उघड्या नागड्या वास्तवाचे मनावर प्रचंड दडपण येते. शब्द धडाधड मनावर आघात करतात. कल्पना आणि वास्तवाचा नंगानाच भयचकित करतो.

 आठ रसांना पूर्ण फाट्यावर मारून नवकवींनी एकाच रसाचा पूर्ण क्षमतेने मारा सुरु केला आहे तो म्हणजे बीभत्सरस. एखादा कोमल ह्रदयाचा वाचक पूर्व कल्पना नसताना या कविता वाचेल तर तो धक्का बसून  बेशुद्ध पडण्याची दाट शक्यता.

पूर्वी मी कविता करत असे. त्या अश्याच उदात्त प्रेम शृंगार वगैरेंचा अविष्कार करणाऱ्या असत.  (अर्थात त्या बऱ्याचश्या टुकार असत ) पण या नवकविता वाचून माझ्या मनावर अतिशय विपरीत परिमाण झाला. नुकतच एका कवीच्या वाल वर त्याच्या कविता वाचत होतो आणि मला हि काव्य लेखनाची स्फूर्ती झाली मग काय शुभस्य शीघ्रम. धाडकन लिहून टाकली एक कविता.
तर पेश आहे .... 😉😉😉

तिला दूर ढकलत तो धडपडला
“माजलेत साले”  म्हणत भेसूर हसला

" समजता काय भडव्यानो स्वत:ला ?
मी घातल्येय धाड इंद्राच्या जनानखान्यावर
आणि आणलेत तोडून मणी
त्याच्या वज्राचे
गुंफल्येय शब्दांची माळ
डोक्यातल्या कल्पना रात्रीच्या भगभगीत उजेडात
झवत असतात नागड्या वास्तवाला
आणि मग त्या जबरी बलात्कारातून
जन्मतात तेजस्वी कविता

हसताय काय मादरचोदनो
तुम्हालाच फेकून मारणार आहे सटासट
माझ्या कवितांचे दगड.”

रात्रभर बरळत राहिला तो
शब्दांची आय माय एक करत
व्याकुळ होऊन ती पाहत राहिली त्याचा उद्रेक
हताश विकल वांझोटे रुदन

-एक बेफाम नवकवी




बनारस पानाने कापला गळा

कॉलेजमध्ये असताना पार्क स्टेडियम जवळचे एक पान शॉप कम जनरल स्टोर आमचा टवाळक्या करण्याचा अड्डा होता.  सिगारेटी फुंकणे.. नवीन मेंबरना अनुग्रह देऊन संप्रदाय वाढवणे..जवळच असणाऱ्या चॅट च्या गाड्यावर पोटपूजा करणे असा भरगच्च कार्यक्रम असे. पण मुख्य काम म्हणजे बर्ड वॉचिंग. आमची अख्खी गँग म्हणजे पक्षी प्रेमी. पार्क चौक म्हणजे पक्ष्यांचे अभयारण्य.  कॉलेज वरुन परतणारे, ट्यूशन ला जाणारे, खरेदीसाठी बाहेर पडलेले, चॅट खायला जमणारे.... पक्षीच पक्षी.
आमच्या सौंदर्योपासक मनाला तिथे तासन तास विरंगुळा आणि डोळ्यांना थंडावा मिळे.

जवळ असणाऱ्या नेहरू हॉस्टेलवर मी राहत होतो. हॉस्टेलवरचे पाणी कधी कधी गायब होइ. आठ आठ दिवस पाणी येत नसे. त्या समस्येची भीषणता जे नेहरू हॉस्टेलवर राहिले असतील त्यांनाच् माहिती असेल. त्यावेळी एकच उपाय असायचा. चंबु गबाळे आवरून पाणी येईपर्यन्त गावाकडे सुटायचे. आणि जमेल तस जमेल त्या सोईने अप डाऊन करायचे.

तर तेव्हा असच पाणी गेल होत आणि मी गावाकडे पळालो होतो. अश्या वेळी मी बाइक वरुन कॉलेजला जात असे.   त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर आम्ही सर्व टोळभैरव आमच्या अड्डयावर जमलो. भरपूर चकाट्या पिटुन झाल्यावर मी म्हटल "निघतो आता रे, गावाकडे जायचय, आज उशीर झाला." मित्र म्हणाला " थांब आज मस्तपैकी पान खावून जा. मजा येईल बाइकवर. ट्राय करून बघ."

 पान शॉप वाल्याने एक मस्त 120 320 कडक बनारस पान जमवले. मी पहिली वेळच खात होतो. छान वाटले. बाइक सुसाट सोडली. सोलापूरच्या बाहेर आल्यावर नाक्यावर दोन पोरी सायकल ढकलत जात होत्या हे फार दुरुन हेरले. या बाबतीतली आमची दूरदृष्टी म्हणजे अगदी नाथा कामत च्या तोंडात मारणारी. बहुधा सायकल पंचर होती. मी गाडी एकदम स्लो केली आणि मागुन सौंदर्याचा पाठमोरा आस्वाद घेऊ लागलो. लांबलचक शेपटा. ( मुलींचे केस म्हणजे आपला वीक पॉइंट...असो ..हे उगीच ...तसे पंचवीसएक वीक पॉइंट असतील ) तर तो लांबलचक शेपटा. सिटाच्याही खाली पडणारा. संस्कृतच्या वर्गात सुंदर स्त्रियांची लक्षणे सांगताना त्यांचे केस टाचेपर्यन्त रुळत असत अस आमच्या बॉब कट वाल्या कुलकर्णी मॅडम म्हणाल्या होत्या. तर ते सुंदर केस ..तो कमनीय बांधा ..कमालीची आकर्षक चाल ... उफ्
या पोरीने एकदा वळून बघावे आणि तिच्या सुंदर चेहऱ्याचे दर्शन घडवावे अशी मी मनापासून प्रार्थना करू लागलो.

 आणि माझी बाइक पास होताना त्या मुलीने खरेच वळून बघितले. काय ती अप्रतिम रचना विधात्याची. आणि वरुन तिने चक्क एक गोड स्माइल दिले. मोठ्या मुश्किलिने मी बाइक आवरली रस्त्याच्या खाली जाता जाता.

बहुधा माझ्या प्रार्थनेत मी जास्तच जोर लावला असावा किंवा देव जरा फ्री असावा त्यावेळी. तिने चक्क हात करून लिफ्ट मागितली मला. कहरच .. मी धडधडत्या अंतकरणाने बाइक थांबवली. ती कोमलांगी माझ्या खांद्यावर हात ठेवून मागे बसली. आठ दिवस मला तो स्पर्श फिल होत असे नंतर सतत. सावकाश बाइक चालवु लागलो. तिने विचारले
"कोणत्या कॉलेजला आहेस रे ? "
आणि हाय रे दुर्दैव .... तोपर्यन्त मी विसरूनच गेलो होतो की बनारस पान अगदी मस्त जमले होते तोंडात. मला जाम बोलता येईना. तिला उत्तर न आल्याने अजब वाटले असावे. माझ्या ड्रेस वरुन अंदाज करत ती म्हणाली
"ह दे प्र का ? "
मी हं म्हणून मोठा हुंकार दिला. आता बोलता तर येत नाही .पिंक टाकावी तर इज्जतीचा फालूदा. मनातल्या मनात त्या भेंडी मित्राला, त्या टपरीवाल्याला, सगळ्या गँगला,  स्वत: ला, बनारस पानाचा शोध लावणाऱ्याला मोजून अर्वाच्च शिव्या घालू लागलो. त्या पोरीला मी थोडा शिष्ट किंवा विक्षिप्त वाटलो असेन. थोडी चिकटुन बसली होती ती मागे सरकली. अगदी सुरक्षित अंतर ठेवले आता. मध्येच ब्रेक दाबणे,गोड गोड गप्पा,  ..तिचे नाव कॉलेज वगैरे विचारावे, मग कामत कॅफेमध्ये कॉफी, किल्ला बागेतली ती रमणीय संध्याकाळ, प्रभातला सुंदर मैटिनी शो वगैरे माझ्या शेखचिल्ली स्वप्नांचा पार चुराडा झाला. बाइक स्लो घेण्यात आता अर्थच नव्हता. तिचा स्टॉप येताच उतरली. शिष्टाचार म्हणून एक स्माइल देऊन भरभर मागे वळून न पाहता निघुन गेली.

त्यानंतर मी कधीही बनारस पान खाल्ले नाही. जेव्हा जेव्हा मी बाइक वरुन येई तेव्हा विशिष्ट ठिकाणाच्या 1 किमी आधी आणि 1 किमी नंतर ती दिसते का पाहत असे. पण संधी एकदाच दार ठोठावते असे आमचे गणिताचे प्रौढ अविवाहित कुदळे सर नेहमी सांगत त्याची आठवण होइ.
ती कधी दिसलीच नाही परत.


बूमरँग

पृथ्वीराज म्हणजे आमचे ज्युनियर केजी ला असणारे चिरंजीव अधुन मधून टीचरची काहीतरी तक्रार सांगत असतात. एकदा सांगितले मला टीचरनी मारले. क्षणभर संताप आला. मग त्याला खोदुन खोदुन विचारले.  तर नंतर पृथ्वीराजने विधान बदलले. मग म्हणाला मारले नाही बाबा पण रागावल्या. त्याच्या टीचरना त्याच्या नकळत कॉल करून खात्री केली.

मग पृथ्वीला जवळ घेऊन प्रेमाने समजावून सांगू लागलो. की बाळ खोटे बोलू नये ...अमुक अमुक ..तमुक तमुक...बालमानसशास्त्राचा खास राखीव स्टॉक बाहेर काढला.
थोडा वेळ चिरंजीवांनी ऐकून घेतले आणि नंतर खाडकन म्हणाला, " बाबा, मग तुम्ही कस खोट बोलता ? "

मी सटपटलो. म्हटल आता कुठली कुंडली चिरंजीव बाहेर काढतात. मी उसने अवसान आणून म्हटल , " मी खोटे बोलतो ? कधी बोललो सांग बर "

तर चिरंजीवांनी भेदक यॉर्कर टाकला.
"बाबा तुम्ही फोन आल्यावर घरी असता आणि सांगता मी सोलापूरला आहे पंढरपुरला आहे मोहोळला आहे. "
बाबा क्लीन बोल्ड..त्रिफळाचीत. काही क्षण माझी बोलतीच बंद झाली.

कधी कधी नकोश्या व्यक्तीला टाळण्यासाठी अस सांगत असेन मी क्वचित् ...पण त्या थापा अश्या बूमरँग बनून आमच्यावरच आदळतील अस वाटल नव्हतं ..

बस अजिबात खोट बोलायच नाही कधीच नाही  चुकूनही नाही अस ठरवून टाकल.
मग वाटल यात थोडे कन्सेशन हवे. हे व्रत अंमळ कठीणच.
मग ठरवल फोनवर खोटे बोलायचे नाही.
पण हे ही जरा अवघडच होईल नाही का ?
शेवटी मात्र अंतिम कठोर निश्चय केला. पृथ्वीराजसमोर तर आता अजिबात खोटे बोलायचे नाही. 😎😎