शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विधायक व महत्वाची कामे पार पाडली आहेत. त्यापैकी काही कामे पुरोगामी चळवळीला वरदान ठरणारी आहेत.
महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने फुले चरित्र समितीची स्थापना केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 16 खंडात महात्मा फुले यांचे समग्र वाङमय इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत प्रसिद्ध केले.
साधारण त्याच सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्यही पवार साहेबांनी 18 खंडात व इंग्रजी, मराठी या दोन भाषांमध्ये प्रसिद्ध केले. तसेच पवार साहेबांनी या फुले-आंबेडकर समग्र साहित्य खंडांच्या जनआवृत्त्या काढायचे ठरवले. त्यामुळे हे साहित्य मुबलक प्रतींमध्ये व अत्यल्प दरात सामान्य वाचकांसाठी उपलब्ध झाले.
काही दिवसांपूर्वी एका प्रकाशक मित्रासोबत एका दुर्मिळ पुस्तकाबद्दल चर्चा सुरु होती . मित्राला प्रकाशित करण्यासाठी ते पुस्तक हवे होते . पण त्याची छापील प्रतच त्याला एक वर्षापासून उपलब्ध होत नव्हती. चर्चेच्या ओघात त्या प्रकाशक मित्राने सांगितले की सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची मांडणी करणारी अशी अनेक दुर्मिळ पुस्तके आज पुर्नप्रकाशनासाठी उपलब्ध नाहीत. भारताचा जातीय व वर्चस्ववादी इतिहास पाहता असं होण्याचे कारण स्पष्ट आहे.
महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे क्रांतिकारी मूल्य व स्वरूप पाहता हे साहित्य जर राज्य शासनाने प्रसिद्ध केले नसते तर कदाचित त्यापैकी अनेक पुस्तके आज उपलब्ध नसली असती. आणि कदाचित चार्वाक साहित्याप्रमाणे इतरत्र सापडणाऱ्या खंडणमंडणावरून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागला असता.
हे रचनात्मक काम हा पवार साहेबांच्या पुरोगामी कारकीर्दीतला मानाचा तुरा आहे आणि त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना सणसणीत चपराक आहे..
- पुस्तक दिनाच्या निमित्ताने
©सुहास भुसे
महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने फुले चरित्र समितीची स्थापना केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 16 खंडात महात्मा फुले यांचे समग्र वाङमय इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत प्रसिद्ध केले.
साधारण त्याच सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्यही पवार साहेबांनी 18 खंडात व इंग्रजी, मराठी या दोन भाषांमध्ये प्रसिद्ध केले. तसेच पवार साहेबांनी या फुले-आंबेडकर समग्र साहित्य खंडांच्या जनआवृत्त्या काढायचे ठरवले. त्यामुळे हे साहित्य मुबलक प्रतींमध्ये व अत्यल्प दरात सामान्य वाचकांसाठी उपलब्ध झाले.
काही दिवसांपूर्वी एका प्रकाशक मित्रासोबत एका दुर्मिळ पुस्तकाबद्दल चर्चा सुरु होती . मित्राला प्रकाशित करण्यासाठी ते पुस्तक हवे होते . पण त्याची छापील प्रतच त्याला एक वर्षापासून उपलब्ध होत नव्हती. चर्चेच्या ओघात त्या प्रकाशक मित्राने सांगितले की सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची मांडणी करणारी अशी अनेक दुर्मिळ पुस्तके आज पुर्नप्रकाशनासाठी उपलब्ध नाहीत. भारताचा जातीय व वर्चस्ववादी इतिहास पाहता असं होण्याचे कारण स्पष्ट आहे.
महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे क्रांतिकारी मूल्य व स्वरूप पाहता हे साहित्य जर राज्य शासनाने प्रसिद्ध केले नसते तर कदाचित त्यापैकी अनेक पुस्तके आज उपलब्ध नसली असती. आणि कदाचित चार्वाक साहित्याप्रमाणे इतरत्र सापडणाऱ्या खंडणमंडणावरून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागला असता.
हे रचनात्मक काम हा पवार साहेबांच्या पुरोगामी कारकीर्दीतला मानाचा तुरा आहे आणि त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना सणसणीत चपराक आहे..
- पुस्तक दिनाच्या निमित्ताने
©सुहास भुसे