अमेरिकेतल्या कोणा माथेफिरुने श्रीनिवास या भारतीय तरुणाची हत्या करणे आणि ABVP च्या गुंडांचा नंगानाच यात एक साम्य आहे.
प्रत्यक्ष कृती करणारे गुंड, माथेफिरु नाममात्र असतात. त्यांच्यामागे असणारी विचारसरणी ही खरी ट्रिगरचे काम करत असते.
ट्रंप यांचे परदेशी वंशाच्या नागरिकांबद्दलचे प्रक्षोभक विचार, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी केलेली प्रक्षोभक विधाने यानी एक वातावरण निर्मिती केली आहे . ट्रंप सत्तेत येताच या विचारसरणीच्या लोकांना जोर चढणे साहजिक आहे. अश्या घटना पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तोच प्रकार भारतात होत आहे. 2014 पूर्वी कोणाला फारशी ठावुकही नसणारी ABVP ही मवाल्यांची, गुंडांची गैंग आज खुलेआम स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या देत आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. हा माज त्यांच्या विचारसरणीचे लोक सत्तेत आल्याने आलेला आहे हे उघड गुपीत आहे.
गांधीहत्येस नथुराम पेक्षा ज्या विचारसरणीने गांधीविरोधी वातावरण तयार केले ती अधिक कारणीभुत होती. नथुराम कोणीही मिळाला असता. दाभोळकर पानसरे यांच्याबद्दलही तेच.
घटना, विचार, प्रतिके, संघटना यांचे आपसात गुंतलेले हे जाळे आहे. यांचा मुकाबला करायचा असेल तर मुळावर घाव घालुन ते निष्प्रभ केले पाहिजे. हे लोक काय चीज आहेत याची जाणीव समाजात सदैव धगधगती ठेऊन याना सर्वंकष सत्तेपासून सदैव दूर राखले पाहिजे. यांना ताकद द्याल तर उद्या हे दुधारी शस्त्र तुमच्यावरच उलटण्याची शक्यता नजरेआड करू नका.
©सुहास भुसे.
प्रत्यक्ष कृती करणारे गुंड, माथेफिरु नाममात्र असतात. त्यांच्यामागे असणारी विचारसरणी ही खरी ट्रिगरचे काम करत असते.
ट्रंप यांचे परदेशी वंशाच्या नागरिकांबद्दलचे प्रक्षोभक विचार, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी केलेली प्रक्षोभक विधाने यानी एक वातावरण निर्मिती केली आहे . ट्रंप सत्तेत येताच या विचारसरणीच्या लोकांना जोर चढणे साहजिक आहे. अश्या घटना पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तोच प्रकार भारतात होत आहे. 2014 पूर्वी कोणाला फारशी ठावुकही नसणारी ABVP ही मवाल्यांची, गुंडांची गैंग आज खुलेआम स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या देत आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. हा माज त्यांच्या विचारसरणीचे लोक सत्तेत आल्याने आलेला आहे हे उघड गुपीत आहे.
गांधीहत्येस नथुराम पेक्षा ज्या विचारसरणीने गांधीविरोधी वातावरण तयार केले ती अधिक कारणीभुत होती. नथुराम कोणीही मिळाला असता. दाभोळकर पानसरे यांच्याबद्दलही तेच.
घटना, विचार, प्रतिके, संघटना यांचे आपसात गुंतलेले हे जाळे आहे. यांचा मुकाबला करायचा असेल तर मुळावर घाव घालुन ते निष्प्रभ केले पाहिजे. हे लोक काय चीज आहेत याची जाणीव समाजात सदैव धगधगती ठेऊन याना सर्वंकष सत्तेपासून सदैव दूर राखले पाहिजे. यांना ताकद द्याल तर उद्या हे दुधारी शस्त्र तुमच्यावरच उलटण्याची शक्यता नजरेआड करू नका.
©सुहास भुसे.