एक म्हातारा शेतकरी मृत्युशय्येवर असताना आपल्या चार मुलांना बोलावुन त्यांना आपण शेतात गुप्तधन पूरले आहे अस गुह्य सांगतो, आणि मुले मग सगळे शेत खणून काढतात. गुप्तधन तर सापडत नाही पण मशागत चांगली झाल्याने पीक जोमदार येते व ती मुले सुखी होतात.
तात्पर्य:- कष्टेवीन फळ नाही.
मूल्यशिक्षणाच्या पहिल्या तासाला शिक्षक ही गोष्ट सांगतात. पण विद्यार्थी सकाळी नाष्टा करताना गुजरातमध्ये संगीत रजनीच्या कार्यक्रमात धनदांडग्यांनी पाडलेला नोटांचा पाऊस आणि त्यात पखवाज, तबले अर्धेअधिक पूरले गेलेले न्यूजमध्ये बघुन आलेला असतो.
आदल्या रात्री होमवर्क आटोपुन त्याने अब्बास मस्तानचा रेस 2 सारखा मुव्ही बघितलेला असतो. त्यातील व्हाइट कॉलर गुन्हेगारांची आलिशान जीवनशैली पाहिलेली असते.
दुसरीकडे वृत्तपत्रात त्याने मराठा क्रांती मूक मोर्च्यांमागच्या खदखदीची विश्लेषणे वाचलेली असतात. शेती आणि त्यात राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची दुरावस्था तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो. विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान इतके तरी खचितच पक्के झालेले असते की शेतकऱ्यांच्या 200 पिढ्या कष्टच करत आल्या आहेत. पुढच्या दोनशे पिढ्या जरी कष्ट करत अश्याच त्या काळ्या मातीत मेल्या तरीही तो नोटांची तशी मोजोरडी उधळण करू शकणार नाही.
सर मोठे आलेत सांगणारे, म्हणे कष्टेवीन फळ नाही. कष्ट केल्यावर घंटा फळ मिळते !! फळ मिळण्यासाठी तर कष्ट सोडून दूसरेच काहीतरी करायला लागते.
पुस्तकात आहे म्हणून सरांना शिकवावे लागते. आपल्याला पेपर लिहायचा असतो म्हणुन शिकावे लागते एवढाच त्याचा माफक अर्थ !!
गोष्टीच्या तात्पर्यासबंधी अस विचारचक्र विद्यार्थ्याच्या मनात सुरु असेल तर त्यात त्याचा दोष कसा म्हणायचा ?
©सुहास भुसे
तात्पर्य:- कष्टेवीन फळ नाही.
मूल्यशिक्षणाच्या पहिल्या तासाला शिक्षक ही गोष्ट सांगतात. पण विद्यार्थी सकाळी नाष्टा करताना गुजरातमध्ये संगीत रजनीच्या कार्यक्रमात धनदांडग्यांनी पाडलेला नोटांचा पाऊस आणि त्यात पखवाज, तबले अर्धेअधिक पूरले गेलेले न्यूजमध्ये बघुन आलेला असतो.
आदल्या रात्री होमवर्क आटोपुन त्याने अब्बास मस्तानचा रेस 2 सारखा मुव्ही बघितलेला असतो. त्यातील व्हाइट कॉलर गुन्हेगारांची आलिशान जीवनशैली पाहिलेली असते.
दुसरीकडे वृत्तपत्रात त्याने मराठा क्रांती मूक मोर्च्यांमागच्या खदखदीची विश्लेषणे वाचलेली असतात. शेती आणि त्यात राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची दुरावस्था तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो. विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान इतके तरी खचितच पक्के झालेले असते की शेतकऱ्यांच्या 200 पिढ्या कष्टच करत आल्या आहेत. पुढच्या दोनशे पिढ्या जरी कष्ट करत अश्याच त्या काळ्या मातीत मेल्या तरीही तो नोटांची तशी मोजोरडी उधळण करू शकणार नाही.
सर मोठे आलेत सांगणारे, म्हणे कष्टेवीन फळ नाही. कष्ट केल्यावर घंटा फळ मिळते !! फळ मिळण्यासाठी तर कष्ट सोडून दूसरेच काहीतरी करायला लागते.
पुस्तकात आहे म्हणून सरांना शिकवावे लागते. आपल्याला पेपर लिहायचा असतो म्हणुन शिकावे लागते एवढाच त्याचा माफक अर्थ !!
गोष्टीच्या तात्पर्यासबंधी अस विचारचक्र विद्यार्थ्याच्या मनात सुरु असेल तर त्यात त्याचा दोष कसा म्हणायचा ?
©सुहास भुसे