About

Friday 9 September 2016

छत्रपती कोणाचे?

ब्राह्मण बहुजन समाजाचे शत्रु आहेत, ब्राह्मण इतिहासाची मोडतोड करतात हे समाजावर इतक्या प्रमाणात बिंबल आहे की या काही नव्या बांडगुळांकडे दुर्लक्ष होत आहे. छत्रपतींच्या हातातली विष्णुची मूर्ती कशी तथ्यहीन आहे याची मांडणी करत असताना त्यांच्या हातातले कुराण दुर्लक्षित होत आहे.
अर्थात ही तुर्त तरी बांडगुळेच आहेत.
त्यांचे उपद्रवमूल्य त्यांच्या उघड आणि धांदात खोटेपणामुळे जवळ जवळ नगण्य आहे.
पण हा अपप्रचार कितीही तथ्यहीन आणि विनोदी असला तरी सुसूत्र पद्धतीने आणि निश्चित उद्दिष्ट ठेवून केला जात आहे हे नाकारता येणार नाही.

"1950 नंतर आम्ही कोणाला राजा मानत नाही. " अशी विधाने काही विशिष्ट उद्देश् डोळ्यांपुढे ठेवून केली जातात.
मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या जातीसाठी काय केले ?
आम्ही शिवाजी आणि संभाजी यांना फक्त याचसाठी मानतो की या परंपरेने आम्हाला राजर्षी शाहूसारखा राजा दिला. असा प्रचार सुरु होतो. छत्रपतीना साडेतीन जिल्ह्याचा स्वामी ठरवण्याचे अनाव्रती अश्लाघ्य प्रयत्न होतात.

एका पातळीवर छत्रपतींचे अलौकिक कार्य नाकारुन त्यांची महत्ता कमी करण्याचे प्रयत्न होत असतानाच राजमाता जिजाऊ पर्यायाने छत्रपती हे बौद्ध आहेत असा प्रचार दुसऱ्या पातळीवरुन सुरु ठेवला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते किंवा मुस्लिमविरोधी नव्हते हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या हातात कुरआन दाखवण्यापर्यन्त जाऊन पोहोचतो.

कोण आहेत हे लोक ? काय हेतु आहे त्यांचा इतिहासाच्या या विकृतीकरणामागे ?

सध्या समाजात पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या प्रमाणात जातीय अस्मिता टोकदार झाल्या आहेत. हे काही आपोआप झालेले नाही. जातीय ध्रुवीकरण करुन त्यातून आपापले हेतु साध्य करणाऱ्या मंडळींकडून हे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.

एक उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेजस्वी प्रतिक आपल्याकडे असावे या भावनेतुन ही किळसवाणी खोटेपणाचा कळस असलेली खेचाखेच सुरु आहे.

दूसरा उद्देश जो समाज छत्रपतींना मानतो त्या समाजाचा तेजोभंग करणे.

आणि तिसरा उद्देश बहुजन समाज जो एकमुखाने छत्रपतीना मानतो त्यांच्यात दुफळी माजवून सर्व सामाजिक चळवळी कमजोर करणे.

छत्रपती हे सर्व जाती धर्माना एकत्र आणणारे, आणु शकणारे एक शक्तिशाली ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. जातींच्या पलीकडची आणि सर्वमान्य असणारी अशी खुप कमी प्रतिके आहेत जी जातीपातींना एकत्र बांधून ठेवत त्यांना एक समाज बनवत असतात.

अश्या खोटेपणाला त्या त्या ठिकाणी ऐतिहासिक तथ्ये व पुराव्यांच्या सहाय्याने चोख प्रत्त्युत्तर देत हे बांडगुळी प्रयत्न शिवप्रेमींनी हाणून पाडले पाहिजेत.
आणि छत्रपतींचा तेजस्वी आणि खरा इतिहास ज्याला ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातून आपापल्या कुवतीप्रमाणे मांडत राहिले पाहिजे.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment