About

Monday 19 September 2016

सहकार:विकास केंद्रे की पिळवणूक केंद्रे

'साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका आणि एकूणच सहकारी चळवळ यांच्यामुळेच मराठा समाजाची पिळवणुक झाली आणि या सर्व किंवा बहुतेक संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत.'

हे शहरी विश्लेषकांचे -जे उन्हाळी सुट्टीला चारेक दिवस हवापालट म्हणून ग्रामीण भागात जातात न जातात- मराठा मोर्च्यांमागील असंतोषाचे आवडते विश्लेषण आहे.

सहकारी साखर कारखाने कोणत्या संघर्षातून उभे राहिले , त्यासाठी किती मोठा लढा दिला विखे बाबा, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अश्या दिगग्जांनी... याची कृपया या अभ्यासकांनी माहिती घ्यावी ..
त्या अत्यंत गरीबीच्या काळात फाटक्या-तुटक्या शेतकऱ्यांकडून वणवण करुन त्यांनी शेअर्सचे पैसे कसे जमवले याचा अभ्यास करावा.

कोरडवाहु क्षेत्रात भगीरथ प्रयत्नांनी हरित क्रांती कशी घडवली याचा अभ्यास करावा. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी या उक्तीप्रमाणे  सहकार धुरीणांनी हे सगळे शुन्यातुन कसे साकारले याची माहिती घ्यावी.

सहकारी संस्था ही पिळवणूक केंद्रे नसून कॉर्पोरेटस् च्या विळख्यातुन शेतकऱ्यांना अद्यापपर्यन्त लांब ठेवणारी विकासमंदिरे आहेत.

एका -एका साखर कारखान्यामुळे त्या सबंध परिसराचा कसा कायापालट झाला आहे ... याची तुलना
ज्या ग्रामीण भागात कारखाने नाहीत त्यांच्याशी करुन बघावी आणि मगच उपरोक्त विधान करावे ...

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment