उजनी धरण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 वर्षे दुष्काळ पडला तरी पाणी पुरावे हा हिशोब ठेऊन बांधलेले आहे. 2000 ते 2015 या 15 वर्षात 5 दुष्काळ पडले. दरवेळी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले गेले. लातूर आणि मराठवाड्याएवढी भयंकर अवस्था सोलापुरवर कधीही ओढवली नाही. थोडी फार वैरण, थोडी पीके आणि माणसांना, गुरा ढोरांना पुरेसे पाणी .. कडक मधल्या कडक दुष्काळात एवढे तरी जपले जायचेच !!
या नियोजनाला सुरुंग लागला 2016 साली.
आदल्या वर्षी बऱ्यापैकी असणारा पाणी साठा कोरडा पडला आणि सोलापुरला पहिल्यांदा आपण राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलो तरी भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहोत याची जाणीव झाली. 15-20 वर्षात कधीही पूर्णपणे कोरडे न पडलेले कालवे कोरडेफट्ट पडले.
मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला. धरण 100 % भरले. आता तीन राहिली किमान दोन वर्षे तरी चिंता नाही अस म्हणत बळी राजा निर्धास्त झाला. पण आज उजनी मधील 60 % पाणीसाठा संपला अशी बातमी आली आणि बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाळा संपुन पुरते 4 महीने उलटतात न उलटतात तो 151 टीएमसीच्या प्रचंड धरणातले 60 % पाणी गेले कुठे ? उद्योगानी पळवले की बेसुमार वापर झाला ?
पण हे कळू शकेल अशी यंत्रणा अस्तित्वात नाही. पाण्याचे ऑडिट होत नाही. करोडो लोकांचे जीवन अवलंबून असणारे पाणी कोण किती वापरते याची माहिती सामान्य माणसाला मिळणे दुरापास्त आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. उजनी धरणाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याच्या ऑडिटची मागणी लावून धरायला हवी. मोठ्या प्रमाणात जागृती झाली नाही तर हे लोक असेच आपले पाणी पळवत राहतील, धरणातले पण आणि तोंडचे पण !!!
©सुहास भुसे
या नियोजनाला सुरुंग लागला 2016 साली.
आदल्या वर्षी बऱ्यापैकी असणारा पाणी साठा कोरडा पडला आणि सोलापुरला पहिल्यांदा आपण राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलो तरी भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहोत याची जाणीव झाली. 15-20 वर्षात कधीही पूर्णपणे कोरडे न पडलेले कालवे कोरडेफट्ट पडले.
मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला. धरण 100 % भरले. आता तीन राहिली किमान दोन वर्षे तरी चिंता नाही अस म्हणत बळी राजा निर्धास्त झाला. पण आज उजनी मधील 60 % पाणीसाठा संपला अशी बातमी आली आणि बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाळा संपुन पुरते 4 महीने उलटतात न उलटतात तो 151 टीएमसीच्या प्रचंड धरणातले 60 % पाणी गेले कुठे ? उद्योगानी पळवले की बेसुमार वापर झाला ?
पण हे कळू शकेल अशी यंत्रणा अस्तित्वात नाही. पाण्याचे ऑडिट होत नाही. करोडो लोकांचे जीवन अवलंबून असणारे पाणी कोण किती वापरते याची माहिती सामान्य माणसाला मिळणे दुरापास्त आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. उजनी धरणाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याच्या ऑडिटची मागणी लावून धरायला हवी. मोठ्या प्रमाणात जागृती झाली नाही तर हे लोक असेच आपले पाणी पळवत राहतील, धरणातले पण आणि तोंडचे पण !!!
©सुहास भुसे
No comments:
Post a Comment