About

Sunday 23 July 2017

अश्रू

मा प्रधानसेवक मोदीजी गांधी घराण्यावर कितीही टीका करत असले तरी त्यांचे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या लोकोत्तर प्रतिमेचे आकर्षण लपून राहिलेले नाही. विशेषतः इंदिराजींची भ्रष्ट नक्कल करण्याच्या ते सदैव प्रयत्नात असतात.

या संदर्भात एक सहज जाणवलेली तुलनात्मक गोष्ट.
संजय गांधी यांच्या अंत्यविधीच्या वेळी इंदिराजीनी काळा चष्मा घातला होता. राजीव गांधी यांच्या अंत्यविधीप्रसंगी सोनिया गांधींनी देखील काळा चष्मा घातला होता. अश्रू हे कमजोरपणाचे लक्षण मानले जाते. या कठीण प्रसंगी आपण गर्भगळीत दिसलो तर आपल्या कुटुंबियांवर, आपल्यावर प्रेम करणाऱ्या उपस्थित लोकांवर त्याचा चांगला परिणाम होणार नाही. त्यामुळे मोठ्या धीरोदात्तपणे अश्रू थोपवून धरले असले तरी त्यातूनही डोळ्यांतून ओघळणारा एखादा चुकार अश्रूबिंदू लोकांना दिसू नये हा उद्देश काळा चष्मा घालण्यामागे होता.

या पार्श्वभूमीवर आपले प्रधानसेवक भर सभेत धाय मोकलून रडतात. 'मैंने देश के लिये घर बार, सबकुछ छोडा' असं आर्त टाहो फोडून सांगतात. महनीय व लोकोत्तर व्यक्तिमत्वांचे अनुकरण करणेदेखील इतके सहजसाध्य व सोपे नसते. वागण्याबोलण्यातली सुसंस्कृता, शालीन वावर, वैचारिक परिपक्वता ही पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारांमधूनच अंगात मुरत असते. शेवटी खानदानी, घरंदाज, सुसंस्कृत लोकांत आणि उठवळ, लाटेवर स्वार होऊन मोठ्या झालेल्या, उथळ, सवंग लोकांत फरक हा राहणारच...
कितीही झालं तरी .....
©सुहास भुसे

No comments:

Post a Comment