About

Wednesday 10 February 2016

देहूची लोकसमजूत आणि इतिहास

युरोपीय देशांत थोर ऐतिहासिक व्यक्तींचा इतिहास जपून ठेवला जातो. हजारो वर्षापूर्वीच्या लोकांची हस्ताक्षरे, त्यांचा जीवनपट, राहती घरे, कपडे, वस्तू वगैरे. त्यामुळे कदाचित ऐतिहासिक तथ्यांवरून वाद होत नसावेत.

आपल्याकडे विशुद्ध आणि  निर्विवाद अस काही अस्तित्वात नाही. जे आहे ते सगळे प्रक्षेपित आणि हेतूपुरस्पर सोयीस्कररित्या वळवलेले किंवा भेसळ केलेले.

अश्या वेळी अनेक ऐतिहासिक तथ्यांची उकल करण्यास लोकसंस्कृती, रूढी, परंपरा आणि लोकसमजुती खूप उपकारक ठरतात.

एकदा असेच चर्चा सुरु असताना एका मित्राने त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली.

सुमारे ४० वर्षांपूर्वी त्याचे वडील देहू ला गेले होते. तिथे इंद्रायणीच्या डोहात मोठ मोठे मासे पाहून त्यांनी एका स्थानिकाला विचारले.

 “अरे तुम्ही या डोहात मासेमारी करत नाहीत का ? हे इतके मोठे मोठे मासे कसे काय इथे?”

त्यावर त्या स्थानिक व्यक्तीने तिथली एक लोकसमजूत, रूढी सांगितली. जी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ठरावी.

“या डोहातील ज्या माश्यांनी तुकाराम महाराजांचे मांस खाल्ले होते त्या माश्यांचे  वंशज म्हणजे हे आजचे इथले मासे . आम्ही यांना खाल्ले तर ते तुकारामांचे मांस खाल्ल्यासारखे होईल. म्हणून देहूच्या डोहात मासेमारी केली जात नाही.”

अश्या समजुती, परंपरा विनाकारण निर्माण होत नाहीत. त्यांना काहीही न काही पार्श्वभूमी असते. ज्यांच्या हातात लेखन वाचनाच्या चाव्या नव्हत्या अश्या समाजाने अनेक स्फोटक सत्ये आणि तथ्ये आपल्या अश्या छोट्या छोट्या स्थानिक रूढी, लोकपरंपरातून जपलेली असतात. इतिहास संशोधकांनी अश्या गोष्टींचा वेध घेऊन त्यांची तर्कशुद्ध मांडणी करणे अनेक ऐतिहासिक पापांना वाचा फोडणारे व अनेक वादग्रस्त घटनांची उकल करणारे ठरू शकेल.

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment