About

Wednesday 22 August 2012

जिहादचा इतिहास


वाचक मित्रहो,

देशभर फोफावत असलेला इस्लामी दहशतवाद, त्यामागची मुस्लीम आणि त्याला बळी पडणार्या हिंदूंची मानसिकता या संदर्भात माझा इस्लामी दहशतवादाची पाळेमुळे हा लेख आपण वाचलाच असेल. याच मालिकेतील या दुसऱ्या लेखात हा दहशतवाद या दंगली कशा संचालित होतात वा केल्या जातात ( इथे संचालित हा शब्द पूर्ण विचार करून वापरला आहे ) या दंगली घडवून आणण्यामागे कोणाचा हात असतो, आणि या पाठीमागचे इस्लामचे तत्वज्ञान काय आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

साधारणत: प्रत्येक कुटुंबवत्सल माणूस हा शांतताप्रिय असतो असे एक मानसशास्त्रीय निरीक्षण आहे. सर्वसामान्य नागरिकांना मग ते कोणत्याही धर्माचे असोत चाकोरीबद्ध जगणे प्रिय असते. मग अस काय होत कि एखादा मुल्ला, मौलवी जिहादची हाक देतो आणि दहा हजार, पन्नास हजार , लाखांच्या संख्येने मुस्लीम समुदाय त्याला प्रतिसाद देतो. जाळपोळ, हिंसा, बलात्कार घडवून आणले जातात? देश , हि भूमी जिने आपल्या बापजाद्यांच्या लाखो पिढ्या पोसल्या आहेत तिच्यावरची निष्ठा, उच्च नैतिक मुल्ये पायदळी तुडवली जातात ? इतके सामर्थ्य त्या मुल्ला, मौलवींच्या हाकेला कोठून प्राप्त होते ? एखाद्या हिंदू धर्मीय साधूने किंवा एखाद्या संताने अशी इतर धर्मियांवर हल्लाबोल ची हाक दिली तर त्याला कितपत प्रतिसाद मिळेल ? एखाद्या हिंदू संघटनेने दंगल घडवून आणायची म्हटले तर काय होईल ? किती हिंदू घरे सोडून रस्त्यावर उतरतील ? आज पर्यंत हिंदूंच्या हिंसेची किती उदाहरणे इतिहासाला माहित आहेत ? हिंसात्मक कृत्यांमध्ये हिंदूंचा सहभाग असतो तो मुस्लीम हल्ल्यांची प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर म्हणून . हिंदूंनी सुरु केलेल्या दंगलींचे एकही उदाहरण सांगता येणार नाही. आणि मुस्लीम धर्माचा इतिहास हिंसेने भरलेला आहे. रक्तरंजित, बिभत्स कृत्यांनी भरलेला आहे. वानगीदाखल हिंदुस्तानात अलीकडच्या काळात झालेल्या मोठ्या जिहादी दंगलींवर व घातपाती दहशत वादी कारवायांवर एक नजर टाकूया.

१)             १९२१ चे कुप्रसिद्ध मोपल्याचे बंड
२)            १९४६ चे नौखालीचे दंगे
३)            १९४७ फाळणीच्या वेळच्या अमानुष दंगलीत झालेले बीभत्स अत्याचार  
४)            काश्मिरात १९४७ पासून आजतागायत सुरु असलेला हिंदूचा वंशविच्छेद
५)           संसदेवरील हल्ला
६)             मुंबईचे बॉम्बस्फोट
७)           गोध्राचे जळीतकांड
८)            पुण्यातले बॉम्बस्फोट
९)             आसाम मधला वांशिक हिंसाचार
१०)         रझा अकादमी कृत मुंबईची दंगल

आता हि सर्व बीभत्स आणि माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये म्हणजे  माथेफिरू अविचारी समाजकंटकांची कृत्ये आहेत. दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो अशी लोकांची चुकीची समजूत  आपले अनेक नेते, मिडीयावाले , मानवाधिकारवाले करून देत असतात. पण जिहादी दंगली म्हणजे यापैकी काही नाही. जिहादला एक निश्चित अशी तात्विक बैठक आहे. जिहाद हे एक थंड डोक्याने डोक्याने विचारपूर्वक केलेले पूर्वनियोजित कृत्य असते. वांशिक हिंसाचार आणि दंगली हे जिहादचेच दृश्यमान रूप आहे.

जिहाद हि संकल्पना आणि त्याला कुराण, हादिसं आणि शरियत या तीन प्रमुख इस्लामी ग्रंथामध्ये असणारा आधार प्रत्यक्ष त्या मध्ये असणार् या आयातींच्या अनुवादाच्या पुराव्याधारे मी पुढच्या लेखामध्ये मांडेन .

                                   
                              सुहास भुसे
                              (१८-८-२०१२)


      

No comments:

Post a Comment