About

Thursday 2 February 2017

ढोंगी प्रतिगांधी

अण्णा हजारे ! एकेकाळी राळेगणसिद्धिचे गांधी म्हणून अण्णा हजारेना लोक ओळखत असत. अण्णांच्या लोकपाल आंदोलनात सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला. लोक अण्णांमध्ये आपल्या प्रिय बापुंना बघत. बापुंसारख कोणीतरी या देशात असावे या लालसेपोटी ते अण्णांच्या दोन तासाला बदलल्या जाणाऱ्या, कधीही एक सुरकुतीही नसणाऱ्या शुभ्र धवल परीटघडीच्या कपड्यांकडे दुर्लक्ष करत. तो महात्मा आयुष्यभर एक साधा पंचा नेसुन वावरला हे लोकांना ठाऊक नसे अस नव्हे. महात्म्याचे खपाटीला गेलेले पोट, गाल, बारीकशी कुडी आठवत लोक अण्णांचे लाली चढलेले, वर येणारे गाल बघत असत. महात्म्याच्या तोंडावरचे जनसेवेचे, सत्याच्या प्रयोगांचे तेज आठवत अण्णांच्या तोंडावर चढणारे सुखाचे तेज बघत असत.
बापुंचा अराजकीय वारस म्हणून अण्णाना हजार गोष्टी लोकांनी माफ करून टाकल्या. कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात अण्णाचा फार मोठा हात होता.

सरकार बदलले. लोकपाल गंगेला मिळाले. घोटाळे नव्या दमाने सुरु आहेत. पण अण्णानी जे तोंडाला कुलुप लावले आहे ते उघडायचे नावच नाही. जणु यूपीए चे सरकार पाडणे हेच त्यांचे अवतारकार्य होते. अण्णा अजुनही क्वचित तोंडाचे कुलुप किलकिले करतात ते पवारांवर आरोप करण्यासाठीच. पण लोकांनी आता या ढोंगी नकली गांधीला पुरते ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची त्यांचे पित्तेही दखल घेत नाहीत. मिडिया आणि जनता तर दुरच. अण्णा हे प्रतिगांधी नसून सरकारराज मध्ये दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले महापाताळयंत्री रावसाहब आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे.
एका गालावर मारली तर दूसरा गाल पुढे करा म्हणणाऱ्या त्या थोर महात्म्याची शिकवण या  क्रोध, मोह ,मद ,मत्सर आदि षड्रिपुनी पोखरलेल्या ढोंगी माणसाने ज्या क्षणी ' फक्त एकच ? ' हे निर्लज्ज उद्गार काढले तेव्हाच धुळीला मिळवली आहे.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment