About

Wednesday 4 November 2020

मुस्लिम व धर्मसुधारणा

 हिंदु धर्मातील वाईट गोष्टींवर भरपुर बोलता येईल. ते तसं बोललं जातंही. मुख्य म्हणजे तुम्ही बोलु शकता. 

चार्वाकांपासुन चक्रधरांपर्यंत आणि ग्यानबा तुकारामांपासुन थेट गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत धर्मसुधारणेची फार मोठी परंपरा हिंदु धर्माला लाभली आहे. मुंगीला देखील आपल्याकडून त्रास होऊ नये..

कोणा जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे ..

अशा व्यापक मानवतावादी पायावर हिंदु धर्माचे दार्शनिक तत्वज्ञान उभे आहे.

दुष्टांना संपवणे दार्शनिकांच्या स्वप्नात देखील येऊ शकत नाही..

दुष्टांचा दुष्टपणा संपावा...जे खळांची व्यंकटी सांडो.


मुस्लिमांच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा हा आहे की एखाद्याला किंवा अधिक नेमकं बोलायचं तर काफिराला ठार करणं, त्याचा गळा चिरण, चाकूने भोकसुन एखाद्याचा जीव घेणं ही त्यांच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वाईट गोष्ट, पाप आहे अथवा नाही ? 

की त्यामुळं तुम्हाला जन्नत नसीब होणार ? मरणोत्तर हूर वगैरेंचा लाभ होणार ?


“आणि हे पवित्र महिने संपल्यावर तुम्हाला मूर्तिपूजक जेथे सापडतील तेथे त्यांना ठार मारा. त्यांना कैद करा. त्यांना वेढा घाला. त्यांच्यासाठी मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसा. परंतु जर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि नमाज अदा केला व जकात दिली तर त्यांना जाऊ द्या.”

- कुराण पाचवा अध्याय (सुरह तौबाह ) पाचवी आयत.

दार्शनिक तत्वज्ञानाचा असा पाया असेल तर दुसरं काय होणार ?


कालबाह्य शिकवणीला कवटाळून बसणं, धर्माची चौकट अत्यंत मजबूत व पोलादी असणं.. आणि धर्मसुधारणांच्या परंपरा अजिबात नसणं किंवा क्षीण असणं हे मुळ दुखणं आहे.  बाकी चर्चाचर्वण निरर्थक आहे.

No comments:

Post a Comment