About

Thursday 6 August 2015

बळवंत पुरंदरे आणि महाराष्ट्र भूषण




     वादग्रस्त कादंबरीकार बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरून सुरु असलेला वाद आता टिपेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. दोन उभे तट जवळ जवळ पडलेच आहेत. समस्त विचारी बहुजनवर्ग पुरंदरेना हा पुरस्कार मिळू नये या मताचा आहे. तर समस्त ब्रम्हवृंद पुरंदरेंच्या कळपात आहे. खेद याचा वाटतो की इतके दिवस स्वत:ला जातनिरपेक्ष पुरोगामी म्हणवणारे ब्राह्मण...शेवटी ब्राह्मणच आहेत असे सिद्ध करत शिंगे मोडून पुरंदरेंच्या कळपात शिरत आहेत. एकूणच सन्माननिय अपवाद वगळता( ही पाॅसिबिलीटी असते म्हणून अन्यथा तसे कोणी माझ्या पाहण्यात नाही ) बहुतांश ब्राह्मण समुदायाच केवळ जात या मुद्द्यावर पुरंदरे यांना समर्थन आहे अस दुर्दैवी चित्र दिसत आहे. आणि ज्यांच्यासाठी हा सर्व तमाशा सुरु आहे ते महाशय काय करत आहेत ?

     मला पुरंदरे यांच्याविषयीचे आक्षेप, त्यांचा विकृत इतिहास व त्याचे खंडन मंडण याहीपेक्षा हा मुद्दा गूढ वाटतो. 31 सप्टेंबर 2003 रोजी झालेल्या जनता बँक व्याख्यानमालेत ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन चे कौतुक करून जे एकदा तोंड बंद केले ते थेट परवा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच उघडले.


     हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ब मो पुरंदरे यांची प्रतिक्रिया पहा, “ महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे खरोखरच खूप आनंद झाला. त्यामुळे आनंद ...आनंद ...आणि फक्त आनंद. या शब्दांशिवाय आता माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीत. पुरस्कारामुळे मनापासून बरे वाटले.”

     ( बळवंत पुरंदरेना पुरस्काराचा मोह नाही म्हणनारांना इतक्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर ही आनंदी आनंद गडे प्रतिक्रिया काहीशी विकृत वाटत नाही का ? )

   आणि झाले...ही जी प्रतिक्रिया दिली त्यानंतर हा चाललेला तमाशा पाहत ही गुप्पचिळी कायम आहे. जेम्स लेन प्रकरणापासून दादोजी कोंडदेव, रामदास इ. आक्षेपार्ह्य संदर्भातील आपली भूमिका मांडण्यासाठी अनेकदा ब मो पुरंदरे यांना अनेक संस्थांनी अनेक व्यासपीठावरून खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. पण प्रत्येक वेळी ती निमंत्रणे धुडकावून लावत पुरंदरे यांनी या विषयावर बोलणे, किंवा आपली भूमिका स्पष्ट करणे सपशेल टाळले आहे. मला तर या पलायनवादाच्या तीन शक्यता वाटतात.

     1. आमच्या गावाकडे एक म्हण वापरली जाते. मला दोन हाणा पण पाटील म्हणा. तस जे चाललय त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. कितीही वातावरण दुषित होवो. माझ्याविरुद्ध कितीही जनमत प्रक्षुब्ध होवो. मला दोन हाणा पण महाराष्ट्रभूषण म्हणा. असा काहीसा नूर ब मोंच्या आनंदी आनंद गडे वक्तव्यावरून दिसतो.

     2. दुसरी शक्यता पुरंदरे यांना पुरावे वगैरेंचे वावडे आहे. जेम्स लेन प्रकरणापासूनच ते पुरावे वगैरे उल्लेख तरी करतात. तत्पूर्वी अनेकदा त्यांना अश्या चर्चेत धोबी पछाड मिळाली आहे.  त्यांचा हा वकूब ध्यानात घेऊनच त्यांच्या कडेचे जे सनातनी कोंडाळे जे ब मों ना वापरू इच्छिते ते त्यांना बोलण्यापासून, प्रतिवाद करण्यापासून रोखत असावेत.

     3. तिसरी शक्यता अशी की आपली लबाडी पूर्णपणे उघडी पडली आहे याची पुरंदरे यांना पुरेपूर जाणीव झाली असावी. परंतु आता इतका सन्मान संपत्ती त्यासाठी उपभोगल्यानंतर तसे कबूल करणे त्यांच्या मूळ वर्चस्ववादी मानसिकतेला पचनी पडत नसावे.

     आता थोडेसे प्रतिवाद करणाऱ्या ब मो समर्थकांकडे वळू. हा जो प्रतिवाद करणारा वर्ग आहे त्याचे खूप मोठ्या काळापासून चर्चा वादविवाद खंडन मंडण हेच प्रमुख काम राहिले आहे. त्यामुळे समोरची बाजू खरी असेल तरी त्यात लूप होल्स शोधून त्यांच्यावरच चर्चा केंद्रित करून मुख्य मुद्द्यांतील हवा काढून घेण्यात ते तरबेज आहेत. यांचे दुसरे कसब म्हणजे विरोध करणारांना बदनाम करून नामोहरम करणे. सोशल मिडियावर चालणाऱ्या अनेक चर्चांचा शेवट हा ब मो पुरंदरे यांना विरोध करणारे जातीयवादी आहेत, ब्राह्मणद्वेषी आहेत, ब्रिगेडी आहेत असे आरोप करून केला जातो. खेडेकर यांचे हिंसक पुस्तक आणि ब्राह्मणी बनावट इतिहासाला प्रत्त्युत्तर म्हणून दिले जाणारे सवाई खोटा इतिहास रुपी प्रत्त्युत्तर (हे अर्थात अनधिकृत पातळीवर) या दोन मुद्द्यांवरून यांनी संभाजी ब्रिगेड या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी ब्राह्मणेतर चळवळीला बदनाम केले आहे. व ब्रिगेडी हा शब्द म्हणजे जणू काय शिवी आहे असा वापरायला सुरु केल आहे. ब्रिगेड मध्ये जे वाईट आहे ते आहेच. त्याचे निव्वळ यातीप्रेमापोटी समर्थन न करता तुमच्या खांद्याला खांदा लावून त्याला विरोध करणारे हजारो मराठे व इतर बहुजन दिसतील. पण पुरंदरे चूक आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका अस ठासून सांगणारा ब्राह्मण आज आपणास शोधून ही सापडत नाही.

     इतरांच्या चुका तुम्ही ठासून सांगणार. पण या इतरांनी मात्र वर्षानुवर्षे यांनी आमच्यावर लादलेला प्रक्षेपित धर्म, वर्णश्रेष्ठत्वाखाली केलेली पिळवणूक, पढवलेला खोटा इतिहास, महापुरुषांची केलेली बदनामी, कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची चूक मान्य न करता त्याच्यामागे एकवटत आपल्या आसुरी एकतेचे करत असलेले प्रदर्शन वगैरे सर्वकाही विसरून या सनातनी प्रतिगामी वर्चस्ववाद्यांकडे जातनिरपेक्ष स्वच्छ दृष्टीने पाहिले पाहिजे असा यांचा दुराग्रह असतो.  यांच्या आसुरी एकतेचे व त्या जोरावर हे माजवत असलेल्या सांस्कृतिक दहशतवादाचे एक उदाहरण ...परवाच एका नामचीन थोबाडपुस्तिका समुहात समूहाच्या अड्मीन ने रामदासांवर केवळ एक चिकित्सात्मक पोस्ट टाकली.. ती ही त्या समुहात नव्हे तर त्याच्या वालवर. अत्यंत संयमी व संयंत भाषेत. तर त्याच्यावर जातीयवादाचा आरोप करत लॉबिंग करून अनेकांनी तो समूह सोडला. रामदास ब्राह्मण आहे म्हणजे बरोबर व महानच आहे. त्याची तुम्ही चिकित्सा देखील करता कामा नये हा दुराग्रह या मंबाजी बिग्रेडच्या सांस्कृतिक दहशतवादाचे उत्तम उदाहरण ठरावा. मंबाजी ब्रिगेड हा प्रतिशब्द सनातनी प्रतिगामी लोकांसाठी सध्या सोशल साईटस वर लोकप्रिय आहे.

     तर या पुरस्कारविरोधी चळवळीत मंबाजी ब्रिगेडने लक्ष केले आहे ते जितेंद्र आव्हाडांना. त्यांना बदनाम करून, धमक्या देऊन, प्रसंगी हल्ले करून गप्प करण्याचे प्रयत्न तर सुरु आहेतच. शिवाय जितुद्धीन, जित्या असे शेलके उल्लेख ( भिडेंना अहो जाहोच बोलले पाहिजे म्हणून हल्ला करणारऱ्या संकृती रक्षकांना स्वत: मात्र कोणत्याही नीच पातळीला जाण्याची मुभा असते ) ..त्यांचे कथित गाझा प्रेम, त्यांच्या वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढणे असे प्रकार करून मूळ पुरंदरे विरोधाचे जे मुद्दे आहेत त्यांना सोयीस्कर बगल देण्याचा बामणी कावा केला जात आहे. शिवाय असाही भास निर्माण केला जात आहे की पुरंदरे यांना फक्त आव्हाड व थोडेसे संभाजी ब्रिगेडवाले यांचाच विरोध आहे बाकी उभा महाराष्ट्र यांच्याच मागे उभा आहे. अर्थात हे ही तितकेच खरे आहे जितका कि यांनी आमच्यावर थोपलेला इतिहास. जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याच्या नादात त्यांच्या मागे एकवटत असलेला जनाधार त्यांना दिसत नाहीये किंवा ते सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. याचा परिणाम ते तोंडावर सडकून आपटण्यात होणार आहे.

     शिवाय संभाजी ब्रिगेडवर जातीय संघटना म्हणून टीका करताना मंबाजी ब्रिगेडवाले सोयीस्कररित्या विसरतात की भारतातली पहिली जातीय संघटना ही त्यांचीच – ‘ ब्राह्मण सभा.   ‘ स्थापन करावी ब्राह्मण मंडळी ' असे सांगणारे रामदास हे स्वराज्याचे प्रेरक या दाव्याच्या चिंधड्या उडाल्या असल्या तरी या ब्राह्मण सभेचे मात्र ते प्रेरक निश्चितच आहेत . मग याच पावलांवर पाउल टाकत ब्राह्मणेतरांच्याही संघटना निर्माण झाल्या तर कोणत्या तोंडाने त्यांच्यावर टीका करणार ?

     बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचे ‘महान’ कार्य व इतर मोठमोठ्या लेखकांनी इतिहासकारांनी त्यांचे काढलेले वाभाडे पुढच्या लेखात पाहू ..त्यावरून हा विरोध फक्त मुठभर लोकांचा किंवा जितेंद्र आव्हाड यांचा नाही तर सर्वंकष आहे हे कळून येईल.
क्रमश:
  -सुहास भुसे


2 comments:

  1. baju barobar asel hi
    pan mahatva purna karya (Ramdaswsami ) karnaryana evdhya khalchya bhashet jaun bolya baddal apli samajdarichi kiv karavi vat te

    ReplyDelete
    Replies
    1. रामदासांवर तर मी अजुन काहीच बोललेलो नाही प्रेमभाऊ
      उद्या लिहितोय पण
      या तिकडे उद्या...तिथेच बोलू

      Delete