About

Saturday 16 May 2015

पुरंदरे, कुणबीनी आणि औचित्य

पुरंदरे प्रकरणावरुन जे वादळ सुरु झालय ते थांबण्याच नाव घेत नाहिये. या निमित्ताने महाराष्ट्रातील जातीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांवर गलिच्छ शब्दात जातीय टिप्पण्या करत आहेत. अनेक नवइतिहास संशोधकांमध्ये पुरंदरे कसे बरोबर आहेत हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली आहे.
यात सर्वात जास्त वादंग सुरु आहे ते ' कुनबीनी ' या शब्दावरुन.
पुरंदरे यांनी एका ठिकाणी ' शिवपूर्व काळात 25 होनात जातिवंत कुनबीनी विकत मिळत असत ' अस विधान केल.
संजय सोनावनी सरांनी हा शब्दप्रयोग कसा योग्य आहे हे सादर करणारे ऐतिहासिक पुरावे आपल्या ब्लॉगवर सादर केले.
त्यानंतर अनेकांनी अनेक संदर्भ तोंडावर फेकण्याचा सपाटा सुरु केला.
सरांच्या अभ्यास आणि व्यासंगाबद्दल आम्हाला आदर आहे. ठीक आहे.
सदरहु पुरावे आम्ही खोटे ठरवत नाही.
किंवा ते अस्सल कागदपत्रांतील असतील तर ठरवताही येणार नाहीत.
..
पण सर्वानी दुर्लक्ष केलेल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे सर्व विचारवंताच लक्ष वळवण्यासाठी हा लेखनप्रपंच !!

ती गोष्ट म्हणजे औचित्य.
काळ या परिमाणामध्ये शब्दांचे अर्थ लवचिक असतात हे कोणीही भाषाशास्त्रज्ञ सांगेल. एखादा शब्द प्राचीन काळात अमुक अर्थाने वापरला जात असेल तर कालौघात त्याचे संदर्भ पर्यायाने अर्थ बदलू शकतात. भाषाशास्त्र अभ्यासक अश्या अनेक शब्दांची आपणास यादी देऊ शकतील.
कधी कधी विशिष्ट परिस्थिती मुळे मूळ शब्दाचा अर्थ बदलतो आणि त्याच एखाद नव रूप प्रचारात येत.
..
उदा. Villain या शब्दाच मूळरूप Villes हा शब्द आहे.
Villes म्हणजे खेड्यात राहणारे लोक
तर Villain म्हणजे खेडगळ लोक असा या शब्दाचा मूळ अर्थ होता.
..
ख्रिश्चन धर्माच्या प्रारंभ काळात या खेड्यात राहणा-या निसर्गपूजक पॅगन लोकांची चर्चला इतकी भीती वाटत असे की त्यांना दुष्ट खलनायक ठरवल गेल.
आणि Villain या शब्दाचा अर्थ बदलून खलनायक असा अर्थ रूढ़ झाला.
..
आता औचित्य ...
पुरंदरेनी ज्या काळात हे पुस्तक लिहिल त्या काळात कुणबी ही एक मान्यताप्राप्त जाति होती. कुणबी-कुणबीनी हे एका महाराष्ट्रात बहुल असणा-या जातीचे प्रतिनिधित्व करणारे शब्द होते. ' जातिवंत कुणबीनी ' या आता वेश्या किंवा भोगदास्या नव्हत्या तर कुलीन मराठ्यांच्या घरशोभा होत्या.
भलेही शिवकाळात हा शब्द कोणत्या का अर्थाने वापरला जात असेल. पण आज हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो याच भान पुरंदरे यांना निश्चितच राखता आल असत. आणि तो शब्द न वापरण्याच..वगळण्याच..बदलण्याच औचित्य राखता आल असत पण त्यांनी ते केल नाही.
त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या विचारवंतांनाही हे औचित्य राखता आल असत. पण त्यांनीही ते राखल नाही.
..
आणि मग आपल्या माताबहिनीँचा असा उद्धार होत असलेला पाहुन चरफड़णा-या..तड़फडणा-या मराठ्यांची "तुम्ही लेको जातीयवादी ते जातीयवादी ..सुधारणार नाहीत ..या मुद्द्याकड़े जातीय दृष्टिकोणातुन बघू नका "
अशी संभावना होत आहे.
हे म्हणजे अस झाल की तुम्ही आमच्या मायभगिनीँचा विनयभंग करणार आणि वरुन आम्हालाच तत्वज्ञानाचे डोस पाजणार " भो बाबा....तुम्ही याच्याकड़े तुमच्या अब्रुवर घाला अश्या दृष्टीकोणातून बघू नका. तर तारुण्यसुलभ लैंगिक उर्मींचा विस्फोट किंवा मनुष्यात निसर्गत:च असणा-या लैंगिक आकर्षणाचा आविष्कार अश्या दृष्टीकोनातून बघा. काय लेको बुरसटलेले विचार तुमचे "
..
बघा ..वाचा ..विचार करा.

सत्य हे नेहमीच सापेक्ष असत.
शेवटी इतिहास इतिहास म्हणजे काय असतो.
जेते किंवा सत्ताधीश आपल्या सोईचा इतिहास लिहून घेतात.
' इतिहास हे स्वभावत: च एका बाजूला झुकलेल वृतांतकथन असत.'
किंवा
नेपोलियन म्हणतो त्याप्रमाणे ' इतिहास म्हणजे सर्वानुमते ठरवलेल्या दंतकथा.'
..
त्याला कितपत महत्व द्यायच आणि त्यावरून उठलेली जातीय वादळ शमवण्यासाठी प्रयत्न करायचा की चिथावनी द्यायची हे ज्याच त्यानं ठरवाव.

- सुहास भूसे.
 (9 मे 2015)

No comments:

Post a Comment