About

Thursday 27 October 2016

भारतीय लोकशाहीची परिपक्वता

भारतीय लोकशाही आणि एकूणच समाजाच्या अपरिपक्वतेचे दर्शन सर्व प्रकारच्या माध्यमांतुन सुरु असलेल्या नॉन इश्शुज् वरील चर्चातुन घडते.
मागच्या महिन्यात कोणता विषय ऐरणीवर होता तर सर्जिकल स्ट्राइक, त्यानंतर तुझी जात माझी जात , मागचा पूर्ण आठवडा पेंग्विनने व्यापुन टाकला, काल आज काय तर सायरस मिस्त्री ...

प्रत्येक आला दिवस नवीन फोल विषय घेऊन येतो.
आणि मग सोशल मीडिया, वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्सवर त्यावर मतामतांचा गलबला सुरु होतो.

रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अनेक समस्यांना सामोरे जात असतो. ग्रामीण भागात पावलापावलावर नवीन समस्या आहेत. शेतीच तर रोज गावे तेवढे कमी अस रडगाणे आहे. रस्ते,वीज, पाणी यांचे कायमचे बारा वाजलेले आहेत. आधुनिक इंफ्रास्टक्चर चा दूरदूरवर गंध देखील नाही. कोणतीही सरकारी किंवा बिगर सरकारी व्यवस्था आपले काम प्रामाणिकपणे करत नाही.

शहरी भागातही सगळ ऑलवेल आहे अस नाही. जे काही थोडे फार बरे आहे ते फक्त ग्रामीण भागाच्या तुलनेत. खड्डामय रस्ते आहेत, गुंडगिरी आहे, भयंकर महागाई आहे, वाहतूक समस्या आहेत, प्रदूषण आहे, बेकारी आहे.
पण रोज हे सगळे फेस करत असूनही कोणी यावर बोलायला तयार नाही.

दिवसाला तीन शेतकरी मरतात इथे आणि कुठला फालतू पेंग्विन मेला त्यावर आपले गप्पांचे फड रंगतात.  कोण फवाद, कोण सलमान ? कोण तो सायरस मिस्त्री ? त्याला टाटांनी काढला किंवा बाटांनी घेतला, कोणाला फरक पडतो इथे ?
पण लोकांना गॉसिप्स आवडतात, मसालेदार विषय आवडतात.  आपले माध्यम कर्मी आणि राजकारणी देखील लोकांची हीच नस ओळखून लोकांना नॉन इश्शुज् मध्ये गुंगवून ठेवतात. खऱ्या समस्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्या पोटावर लाथ मारली जाते.

सर्व सार्वजनिक व्यासपीठांवरचे चर्चांचे विषय जोवर बदलत नाहीत आणि खरा महत्वाचा कोणता विषय आहे याबद्दलचा प्राधान्यक्रम जोवर समाजाच्या ध्यानी येत नाही तोवर भारतीय लोकशाही परिपक्वतेपासून शेकडो योजने दुरच राहील.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment