About

Wednesday 19 October 2016

मोर्च्यांवर टीका का होतेय?

मागील साठेक वर्षांत अनेक जातींचे-धर्मांचे मोर्चे महाराष्ट्राने पाहिले ..
अनेक मोर्च्यांतुन बहकलेल्या मॉब मेंटालिटीमधून प्रक्षोभक भाषा वापरली गेली. बऱ्याचदा जाळपोळ तोडफोडी घडल्या. मोर्चे हिंसक बनले.
पण अस होऊनही मोर्च्यात सहभागी जातीव्यतिरिक्त इतर जातींनी त्या मोर्च्यांवर कधी सर्वंकष जात्यंध टिका केल्याचे उदाहरण नाही.

मराठा क्रांती मोर्च्यांच्या बाबतीत बरोबर याच्या उलट घडत आहे. मोर्च्यात सहभागी जातीसमाज अत्यंत शांततेत महाविराट मोर्चे आयोजित करत संपूर्ण जगात शिस्तीचे नवे मानदंड स्थापित करत आहे.
तर मराठेतर जातीतील सर्वस्तरीय विजारवंत या मोर्च्यांवर जात्यंध टिका करत सामाजिक वातावरण कलुषित करण्यात धन्यता मानत आहेत.

वृत्तपत्रातुन मराठेतर पत्रकार टिका करत आहेत, न्यूज चॅनेलवर वक्ते, प्रवक्ते खुसपटे काढत आहेत. समाजाशी केव्हाच फारकत झालेले लेखक आपली नसणारी प्रज्ञा पाजळत स्वजातीप्रेमाचे विकृत दर्शन घडवत आहेत. फेसबुकी विजारवंत तर बुडाला आग लागल्याप्रमाणे पोस्टवर पोस्ट करत आपल्या वांझोटया जात्यंध विरोधाचे किळसवाणे प्रदर्शन करत आहेत.

हे सर्व कमी की काय म्हणून प्रत्यक्ष सत्ताधारी आणि कॅबिनेट मंत्रीदेखील अवास्तव, मुजोर, जात्यंध विधाने करून या असंतोषाला खतपाणी घालत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यासारखा जबाबदार पदावरील व्यक्ती आजकाल कोणीही उठते आणि आरक्षण मागते अशी गरळ ओकत आहे.

सामजिक वातावरण धूमसत आहे, सलोखा धोक्यात येत आहे म्हणून अरण्यरुदन करत टाहो फोडणाऱ्या निजाती विजारवंतांनी आपली लेखनी या सर्व मराठाद्वेषी जात्यंध घटकांवर चालवायला हवी. तरच त्यांची सामाजिक सलोख्याची चिंता दांभिक नाही अस सिद्ध होईल आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. सामाजिक सलोखा ही सर्व सामाजिक घटकांची जबाबदारी आहे. तो सर्वांना मिळूनच राखता येईल.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment