About

Thursday 6 April 2023

श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग

 नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ डग्लस नॉर्थ गरीब गरीबच का राहतो याची अचुक आणि नेमकी मांडणी करतात.


‘‘देशाच्या बाजारपेठा आणि अन्य महत्त्वाच्या आघाड्यांवरचा ‘प्रवेश’ कसा मर्यादित ठेवता येईल यावर भर देणारी धोरणे जगभरातल्या अर्थरचना स्वीकारतात. त्यामुळे सामान्य माणूस ‘संधी’पासून तर दुरावतोच पण त्याच्यासाठी पुरेशी ‘साधने’ही उपलब्ध नसतात.’’


*संधी आणि साधने ...

समजा एक गरीब शेतकरी कुटुंब आहे किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कामगार कुटुंब आहे. त्याला श्रीमंत बनायचं आहे..

स्वतःची उन्नती साधायची आहे..

पहिली संधी मिळते शिक्षणाच्या रुपात ..

पण शिक्षणाचा दर्जा जसा जसा वाढत जातो तसं तसे ते महाग होत जाते आणि ज्याला दर्जेदार शिक्षण म्हणता येईल ते त्याच्या आवाक्याबाहेरचे असते.

आणि जे शिक्षण तो शासकीय संस्थामधुन घेऊ शकतो ते इतके निम्न दर्जाचे असते की त्याला कुठेही नेऊ शकत नाही.


दुसरा मार्ग असु शकतो स्वतःचा उद्योग सुरू करणे..

त्यासाठी भांडवल अर्थात साधनं उपलब्ध नसतात.

भांडवल उपलब्ध असेल तर सर्वसामान्य माणसाला सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही.

त्याच्या मार्गात अनेक अडथळे उभे केले जातात.


याच प्रमाणे इतरही सर्व प्रकारच्या संधी आणि साधने सामान्य माणसाला नाकारली जातात.

परिणामी सत्ता आणि पैसा यांचे केंद्रीकरण होत जाते.

संधी आणि साधने समाजातील मूठभर वर्गाकडे एकवटत जातात.

गरीब पिढ्यानपिढ्या गरीबच राहतो.


थोडक्यात अशा स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत होण्याचा एकच मार्ग असतो..

श्रीमंत म्हणून जन्माला येणे!!

No comments:

Post a Comment